शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:47 IST

Ayodhya Ram Mandir News: एकदा पीठाधीश्वर झाल्यावर आजीवन मंदिर परिसरातच राहायचे असते. परंतु, महंतांना राम दर्शनाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी ३०० वर्षांची परंपरा मोडली.

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ किंचितही कमी झालेली दिसत नाही. अयोध्येत आजही दररोज लाखो भाविक येत आहेत. राम मंदिरात पहिल्या मजल्यावर राम दरबार तयार केला जात आहे. लवकरच याचे काम पूर्ण होणार आहे. रामललाच्या दर्शनासह श्रीरामांचा भव्य दरबार पाहण्याची संधीही भाविकांना मिळण्याची शक्यता आहे. केवळ भारतातून नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, पर्यटक अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. हनुमानगढीच्या महंतांना राम दर्शनाची एवढी ओढ लागली की, त्यांनी चक्क सुमारे ३०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडली. श्रीरामाचे दर्शन घेण्याच्या त्यांच्या इच्छेचा मान राखण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील हनुमानगढी येथे ३०० वर्षांनंतर एक परंपरा खंडित झाली. पीठाचे प्रमुख महंत प्रेम दास हे मंदिराबाहेर पडले. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने महंतांनी मंदिराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मंदिर परिसर सोडला. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळानंतर हनुमानगढीचे महंत मंदिरातून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. महंत प्रेम दास यांना राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ लागली होती. निर्वाणी आखाड्याने त्यांच्या इच्छेचा मान राखला आणि फक्त एकदा बाहेर जाण्यास परवानगी दिली. हनुमानगढी हे अयोध्येतील हनुमंतांचे सर्वांत सिद्ध मंदिर मानले जाते. राम मंदिरात जाण्यापूर्वी या मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन घेतले पाहिजे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

नेमकी परंपरा काय होती? न्यायालयानेही ठेवला मान

हनुमानगढीचे महंत संजय दास यांनी या परंपरेबाबत माहिती दिली. महंत संजय दास म्हणाले की, ही परंपरा गेल्या सुमारे ३०० वर्षांपासून पाळली जात आहे. स्वतःला भगवान हनुमानाला समर्पित करणे हीच महत्त्वाची भूमिका महंतांनी पार पाडायची आहे. एकदा पीठावर विराजमान झाल्यानंतर महंत त्याच मंदिराच्या परिसरातच आजीवन राहतो. त्याचा देह मृत्यूनंतरच बाहेर पडतो. काही प्रकरणात न्यायालयानेही या परंपरेचा मान राखला आहे. आवश्यकता असेल तेव्हा या आखाड्याचा एक प्रतिनिधी न्यायालयासमोर हजर होतो. १९८० मध्ये महंतांची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने हनुमानगढी मंदिर परिसरातच सुनावणी घेतली होती, अशी माहिती दास यांनी दिली. 

दरम्यान, महंत प्रेम दास मंदिरातून बाहेर पडले, तेव्हा नव्या भव्य राम मंदिराकडे जाताना एक शाही मिरवणूक काढण्यात आली. महंतांचे सर्व शिष्य आणि इतर भाविक त्यात सहभागी झाले होते. शेकडो वर्षांपूर्वी महंतांनी ही परंपरा सुरू केली होती की, महंत त्यांच्या हयातीत हनुमानगढी मंदिर परिसर सोडून कुठेही जाणार नाहीत.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश