शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:47 IST

Ayodhya Ram Mandir News: एकदा पीठाधीश्वर झाल्यावर आजीवन मंदिर परिसरातच राहायचे असते. परंतु, महंतांना राम दर्शनाची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर त्यांनी ३०० वर्षांची परंपरा मोडली.

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ किंचितही कमी झालेली दिसत नाही. अयोध्येत आजही दररोज लाखो भाविक येत आहेत. राम मंदिरात पहिल्या मजल्यावर राम दरबार तयार केला जात आहे. लवकरच याचे काम पूर्ण होणार आहे. रामललाच्या दर्शनासह श्रीरामांचा भव्य दरबार पाहण्याची संधीही भाविकांना मिळण्याची शक्यता आहे. केवळ भारतातून नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक, पर्यटक अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. हनुमानगढीच्या महंतांना राम दर्शनाची एवढी ओढ लागली की, त्यांनी चक्क सुमारे ३०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडली. श्रीरामाचे दर्शन घेण्याच्या त्यांच्या इच्छेचा मान राखण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील हनुमानगढी येथे ३०० वर्षांनंतर एक परंपरा खंडित झाली. पीठाचे प्रमुख महंत प्रेम दास हे मंदिराबाहेर पडले. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने महंतांनी मंदिराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मंदिर परिसर सोडला. सुमारे ३०० वर्षांहून अधिक काळानंतर हनुमानगढीचे महंत मंदिरातून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. महंत प्रेम दास यांना राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेण्याची ओढ लागली होती. निर्वाणी आखाड्याने त्यांच्या इच्छेचा मान राखला आणि फक्त एकदा बाहेर जाण्यास परवानगी दिली. हनुमानगढी हे अयोध्येतील हनुमंतांचे सर्वांत सिद्ध मंदिर मानले जाते. राम मंदिरात जाण्यापूर्वी या मंदिरात जाऊन हनुमानजींचे दर्शन घेतले पाहिजे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

नेमकी परंपरा काय होती? न्यायालयानेही ठेवला मान

हनुमानगढीचे महंत संजय दास यांनी या परंपरेबाबत माहिती दिली. महंत संजय दास म्हणाले की, ही परंपरा गेल्या सुमारे ३०० वर्षांपासून पाळली जात आहे. स्वतःला भगवान हनुमानाला समर्पित करणे हीच महत्त्वाची भूमिका महंतांनी पार पाडायची आहे. एकदा पीठावर विराजमान झाल्यानंतर महंत त्याच मंदिराच्या परिसरातच आजीवन राहतो. त्याचा देह मृत्यूनंतरच बाहेर पडतो. काही प्रकरणात न्यायालयानेही या परंपरेचा मान राखला आहे. आवश्यकता असेल तेव्हा या आखाड्याचा एक प्रतिनिधी न्यायालयासमोर हजर होतो. १९८० मध्ये महंतांची साक्ष नोंदवण्यासाठी न्यायालयाने हनुमानगढी मंदिर परिसरातच सुनावणी घेतली होती, अशी माहिती दास यांनी दिली. 

दरम्यान, महंत प्रेम दास मंदिरातून बाहेर पडले, तेव्हा नव्या भव्य राम मंदिराकडे जाताना एक शाही मिरवणूक काढण्यात आली. महंतांचे सर्व शिष्य आणि इतर भाविक त्यात सहभागी झाले होते. शेकडो वर्षांपूर्वी महंतांनी ही परंपरा सुरू केली होती की, महंत त्यांच्या हयातीत हनुमानगढी मंदिर परिसर सोडून कुठेही जाणार नाहीत.

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश