शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

सबका मालिक एक! दिव्य अवतारी सत्पुरुष श्री साईबाबांची ११ वचने; पाहा, कालातीत शिकवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:22 IST

Preaching Of Sai Baba And 11 Timeless Promises: साई महिमा आणि महात्म्य अनन्य साधारण असून, नित्यनेमाने लाखो भाविक साईबाबांची आपापल्यापरिने मनोभावे सेवा करतात.

Preaching Of Sai Baba And 11 Timeless Promises:  साईबाबा महाराष्ट्रातील एक सत्पुरुष. शिर्डीतील म्हाळसापति नामक एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. म्हाळसापती हे पुढे त्यांचे निस्सीम भक्त बनले.

साईबाबांच्या आध्यात्मिक अधिकाराचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय अनेकांना येऊ लागल्यानंतर एक थोर सत्पुरुष म्हणून त्यांचे नाव शिर्डी गावाच्या सीमांपलीकडे दूरवर पोहोचले आणि शिर्डीला एका पवित्र स्थळाचे माहात्म्य प्राप्त झाले. साईबाबा स्वतः रामाची उपासना करीत. त्यांचे वागणे धार्मिक भेदांच्या पलीकडचे असे. म्हणूनच त्यांच्या भक्तांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश होत गेला. ‘सबका मालिक एक’, ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. शिर्डी येथे त्यांनी देह ठेवल्यानंतर, त्या गावी त्यांच्या समाधी-मंदिराच्या दर्शनार्थ जाणाऱ्यांची संख्या वाढत राहिली. अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे उभारली गेली आणि जात आहेत. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या दिव्य शिष्यांपैकी एक साईबाबा होते, असे मानले जाते. स्वामी महाराजांचा अनुग्रह लाभला होता, असेही सांगितले जाते. 

आईच्या मायेने साई बाबा उपदेश करीत

साईबाबा समाजाचे उत्कृष्ट शिक्षक होते. आईच्या मायेने ते उपदेश करीत. त्यांचा भक्त वाईट मार्गाला लागला तर त्याला ते सन्मार्गाला लावीत. छोट्या छोट्या प्रसंगातून ते अध्यात्माचे महान तत्वज्ञान सांगत. कधी कधी गोष्टी सांगूनही ते लोकांना उपदेश करीत. बाबांच्या चरित्रात दोन गोष्टींना फार महत्व आहे. पहिली गोष्ट म्हणजे उदी आणि दुसरी गोष्ट दक्षिणा. पण या दोन्ही गोष्टी फार सूचक आहेत. त्यात गहन तत्त्वज्ञान भरलेले आहे. उदी ही विवेकाची खूण आहे आणि दक्षिणा ही वैराग्याची खूण आहे. विवेकाशिवाय वैराग्य निरर्थक असते म्हणून बाबांनी विवेक आणि वैराग्याची सांगड घातली. उदी आणि दक्षिणेची सांगड घातली. उदी म्हणजे बाबांच्या धुनीतील राख. ती राख भक्तांना देऊन बाबा जणू हेच शिकवतात की ज्या देहाचे तू पालनपोषण करतोस, ज्या देहावर तू इतके प्रेम करतोस. त्या देहाची शेवटी चिमूटभर राख होणार आहे- या उदीसारखी. या जगात कोणी कोणाचे नाही. एकटा आलास आणि एकटाच जाणार. तुझ्याबरोबर या जगातील काहीच येणार नाही. असा विवेक करून आजपासूनच परमार्थ मार्गाला लाग. जीवनाची नश्वरता या उदीने सांगितली. या उदीने बाबांनी भक्तांचे असाध्य रोग दूर केले.

श्री साईबाबांची अकरा वचने

शिरडीस ज्याचे लागतील पाय । टळती अपाय सर्व त्याचे ॥ १ ॥

माझ्या समाधीची पायरी चढेल । दु:ख हे हरेल सर्व त्याचे ॥ २ ॥

जरी हे शरीर गेलो मी टाकून । तरी मी धावेन भक्तासाठी ॥ ३ ॥

नवसास माझी पावेल समाधी । धरा द्रुढ बुध्दी माझ्या ठायी ॥ ४ ॥

नित्य मी जिवंत, जाणा हेंची सत्य । नित्य घ्या प्रचीत अनुभवे ॥ ५ ॥

शरण मज आला आणि वाया गेला । दाखवा दाखवा ऐसा ॥ ६ ॥

जो जो, मज भजे, जैसा जैसा भावे । तैसा तैसा पावे, मीही त्यासी ॥ ७ ॥

तुमचा मी भार वाहीन सर्वथा । नव्हे हे अन्यथा वचन माझे ॥ ८ ॥

जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस । मागे जे जे त्यास ते ते लाभे ॥ ९ ॥ 

माझा जो जाहला कायावाचामनीं । तयाचा मी रुणी सर्वकाळ ॥ १० ॥ 

साई म्हणे तोची तोची झाला धन्य । झाला जो अनन्य माझ्या पायी ॥ ११ ॥

॥ साईनाथ महाराज की जय ॥

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरspiritualअध्यात्मिक