शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जायभायवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:41 IST

आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे.

ठळक मुद्देपाणीदार गावानंतर शैक्षणिक क्रांतीची सुरुवातशैक्षणिक प्रगतीचा संकल्प

धारुर : ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या जायभायवाडी गावाने पाणी फांडेशनच्या वॉटर कपमध्ये रचनात्मक काम करून पाणीदार गावाची ओळख महाराष्ट्राला करुन दिली. आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून गावातील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा संकल्प केला.जायभायवाडी हे गाव डोंगरात वसलेले. गावाची ओळख ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून. गावाला जायला धड रस्ताही नव्हता. मात्र, या गावाने श्रमदानाची चळवळ एकजुटीने पाणी फांऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून राज्याला दाखवली व गावाची ओळख पाणीदार गाव म्हणून केली. लोकसहभागातून जायभायवाडीची वेगळी ओळख निर्माण करण्यात ग्रामस्थांना यश आले. केली. हे गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाल्याने जायभायवाडीच्या विकासाला दिशा मिळाली. पाणीदार गाव अशी ओळख झालेल्या गावाने शिक्षणाशिवाय गावाची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेत ऊस तोडीला मजूर जाताना शंभर टक्के मुले गावात थांबवण्यात यश मिळविले. उपसरपंचांनी विकासासाठी पुढाकार घेतला. डॉ. सुंदर जायभायेंनी शाळेकडे लक्ष दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून जायभायवाडी येथील जि. प. प्रा. शाळाडिजिटल करण्याचा संकल्प जि. प. चे सीईओ अमोल येडगे व गटशिक्षणाधिकारी गौतम चौपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. दोन्ही वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत. दोन्ही वर्गांमध्ये फरशी बसविण्यात आलेली आहे. मोकळ्या जागेमध्ये फरशी बसविण्यात आलेली असल्याने सकाळी विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी मातीमध्ये बसावे लागतं नाही. शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे व सहशिक्षक गडदे यांनी परिश्रम घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही शिक्षक स्वत: लक्ष देऊन काम करुन घेत होते. ग्राम परिवर्तक जालिंदर वनवे यांचे सहकार्य मिळाले. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.सोलार पॅनलचा वापरमहाराष्ट्र ग्राम परिवर्तनच्या माध्यमातून १ किलोवॅटचा सोलार पॅनल बसवण्यात आला आहे. यामुळे वीजपुरवठा बंद झाला तरी शाळेचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रात्रीचे वर्ग चालवणे सोपे जाणार आहे. शाळेसाठी २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली

टॅग्स :BeedबीडSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटल