शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

जायभायवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:41 IST

आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे.

ठळक मुद्देपाणीदार गावानंतर शैक्षणिक क्रांतीची सुरुवातशैक्षणिक प्रगतीचा संकल्प

धारुर : ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या जायभायवाडी गावाने पाणी फांडेशनच्या वॉटर कपमध्ये रचनात्मक काम करून पाणीदार गावाची ओळख महाराष्ट्राला करुन दिली. आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून गावातील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा संकल्प केला.जायभायवाडी हे गाव डोंगरात वसलेले. गावाची ओळख ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून. गावाला जायला धड रस्ताही नव्हता. मात्र, या गावाने श्रमदानाची चळवळ एकजुटीने पाणी फांऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून राज्याला दाखवली व गावाची ओळख पाणीदार गाव म्हणून केली. लोकसहभागातून जायभायवाडीची वेगळी ओळख निर्माण करण्यात ग्रामस्थांना यश आले. केली. हे गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाल्याने जायभायवाडीच्या विकासाला दिशा मिळाली. पाणीदार गाव अशी ओळख झालेल्या गावाने शिक्षणाशिवाय गावाची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेत ऊस तोडीला मजूर जाताना शंभर टक्के मुले गावात थांबवण्यात यश मिळविले. उपसरपंचांनी विकासासाठी पुढाकार घेतला. डॉ. सुंदर जायभायेंनी शाळेकडे लक्ष दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून जायभायवाडी येथील जि. प. प्रा. शाळाडिजिटल करण्याचा संकल्प जि. प. चे सीईओ अमोल येडगे व गटशिक्षणाधिकारी गौतम चौपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. दोन्ही वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत. दोन्ही वर्गांमध्ये फरशी बसविण्यात आलेली आहे. मोकळ्या जागेमध्ये फरशी बसविण्यात आलेली असल्याने सकाळी विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी मातीमध्ये बसावे लागतं नाही. शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे व सहशिक्षक गडदे यांनी परिश्रम घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही शिक्षक स्वत: लक्ष देऊन काम करुन घेत होते. ग्राम परिवर्तक जालिंदर वनवे यांचे सहकार्य मिळाले. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.सोलार पॅनलचा वापरमहाराष्ट्र ग्राम परिवर्तनच्या माध्यमातून १ किलोवॅटचा सोलार पॅनल बसवण्यात आला आहे. यामुळे वीजपुरवठा बंद झाला तरी शाळेचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रात्रीचे वर्ग चालवणे सोपे जाणार आहे. शाळेसाठी २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली

टॅग्स :BeedबीडSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटल