शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जायभायवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे रुपडे पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:41 IST

आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे.

ठळक मुद्देपाणीदार गावानंतर शैक्षणिक क्रांतीची सुरुवातशैक्षणिक प्रगतीचा संकल्प

धारुर : ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या जायभायवाडी गावाने पाणी फांडेशनच्या वॉटर कपमध्ये रचनात्मक काम करून पाणीदार गावाची ओळख महाराष्ट्राला करुन दिली. आता गावातील शाळेचे रुप पालटून प्रत्यक्ष शैक्षणिक क्रांतीला सुरुवात केली असून, खाजगी शाळेला लाजवेल असे शाळेच रुप केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवून गावातील शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा संकल्प केला.जायभायवाडी हे गाव डोंगरात वसलेले. गावाची ओळख ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून. गावाला जायला धड रस्ताही नव्हता. मात्र, या गावाने श्रमदानाची चळवळ एकजुटीने पाणी फांऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतून राज्याला दाखवली व गावाची ओळख पाणीदार गाव म्हणून केली. लोकसहभागातून जायभायवाडीची वेगळी ओळख निर्माण करण्यात ग्रामस्थांना यश आले. केली. हे गाव कायमस्वरुपी दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करत आहे.महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाल्याने जायभायवाडीच्या विकासाला दिशा मिळाली. पाणीदार गाव अशी ओळख झालेल्या गावाने शिक्षणाशिवाय गावाची प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घेत ऊस तोडीला मजूर जाताना शंभर टक्के मुले गावात थांबवण्यात यश मिळविले. उपसरपंचांनी विकासासाठी पुढाकार घेतला. डॉ. सुंदर जायभायेंनी शाळेकडे लक्ष दिले. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून जायभायवाडी येथील जि. प. प्रा. शाळाडिजिटल करण्याचा संकल्प जि. प. चे सीईओ अमोल येडगे व गटशिक्षणाधिकारी गौतम चौपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. दोन्ही वर्ग डिजिटल करण्यात आलेले आहेत. दोन्ही वर्गांमध्ये फरशी बसविण्यात आलेली आहे. मोकळ्या जागेमध्ये फरशी बसविण्यात आलेली असल्याने सकाळी विद्यार्थ्यांना प्रार्थनेवेळी मातीमध्ये बसावे लागतं नाही. शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे व सहशिक्षक गडदे यांनी परिश्रम घेतले. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही शिक्षक स्वत: लक्ष देऊन काम करुन घेत होते. ग्राम परिवर्तक जालिंदर वनवे यांचे सहकार्य मिळाले. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.सोलार पॅनलचा वापरमहाराष्ट्र ग्राम परिवर्तनच्या माध्यमातून १ किलोवॅटचा सोलार पॅनल बसवण्यात आला आहे. यामुळे वीजपुरवठा बंद झाला तरी शाळेचा वीजपुरवठा सुरु राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रात्रीचे वर्ग चालवणे सोपे जाणार आहे. शाळेसाठी २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली

टॅग्स :BeedबीडSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटल