शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शेतीतील अनिश्चिततेमुळे तरूणांचा लोंढा शहराकडे; मिळेल ते काम करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:17 IST

खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही.

गंगामसला ( बीड ): उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे पूर्वी जेष्ठ मंडळीकडून ऐकायला मिळत असे. तसेच खेड्याकडे चला हे महात्मा गांधीचे म्हणणे होते. परंतु सध्या खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही. अशी स्थितीत ग्रामीण भागात होत असून तरुणांचा मिळेल ते काम करण्याकडे कल वाढला आहे.

एकीकडे रासायनिक खते, बियाणे, औषधे यांच्या दरात होणारी वाढ, शेतीतील नुकसानीमुळे मजुरांना मिळणारी अपुरी मजुरी, तसेच या स्थलांतराने कमी मनुष्यबळामुळे शेतीत मजुरांचा तुटवडा, मधूनच ओढवणारी आस्मानी संकटे, तर दुसरीकडे शेतीच्या मालाची सतत होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांचे  व विशेष म्हणजे युवा पिढीचे मनोधैर्य खचत असताना पाहवयास मिळत आहे. म्हणूनच सध्याची युवा पिढी आपली शेती सोडून गावाबाहेर पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी जाऊन मिळेल ते काम अगदी कमी मोबदल्यात करत आहेत. गेल्या काही दिवसात शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जात आहे. दिवसरात्र उन्हात काबाडकष्ट करून आणलेले पीक बाजारात कवडीमोल भावाने विकले जात आहे. 

भांडवली खर्च सोडाच साधा तोडणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना  आपली उभी पिके सोडून दिल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. एकूणच सगळ्या बाजूंनी शेतीची पडझड झाल्याने अनिश्चित शेती व्यवसायाकडे युवा पिढी कानाडोळा करून नोकरीला प्राधान्य देत आहे.सरकारची चुकीची धोरणे, शेतीचा वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतीतून निश्चित उत्पादन निघण्याची आशा धूसर होत आहे. याचा परिणाम म्हणून परिसरातील युवा पिढी शेतीकडे कानाडोळा करून नोकरीकडे वळत आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड. नारायण गोले पाटील यांनी सांगितले.

सेंद्रिय शेती करावी वेळेचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सेंद्रिय शेती केल्यास चांगले पीक घेता येईल. - आर. जे. शेख, कृषी सहाय्यक

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा