शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतीतील अनिश्चिततेमुळे तरूणांचा लोंढा शहराकडे; मिळेल ते काम करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:17 IST

खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही.

गंगामसला ( बीड ): उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे पूर्वी जेष्ठ मंडळीकडून ऐकायला मिळत असे. तसेच खेड्याकडे चला हे महात्मा गांधीचे म्हणणे होते. परंतु सध्या खते, बियाणे, मजुरी यासारख्या भांडवली खर्चाचे दर गगनाला भिडलेले असताना शेतीमालाचे दर पूर्णपणे गडगडले आहेत. यामुळे अडचणीत येणाऱ्या बेभरवशाच्या शेती व्यवसायावर तरूणपिढीचा भरवसा राहिला नाही. अशी स्थितीत ग्रामीण भागात होत असून तरुणांचा मिळेल ते काम करण्याकडे कल वाढला आहे.

एकीकडे रासायनिक खते, बियाणे, औषधे यांच्या दरात होणारी वाढ, शेतीतील नुकसानीमुळे मजुरांना मिळणारी अपुरी मजुरी, तसेच या स्थलांतराने कमी मनुष्यबळामुळे शेतीत मजुरांचा तुटवडा, मधूनच ओढवणारी आस्मानी संकटे, तर दुसरीकडे शेतीच्या मालाची सतत होणारी घसरण यामुळे शेतकऱ्यांचे  व विशेष म्हणजे युवा पिढीचे मनोधैर्य खचत असताना पाहवयास मिळत आहे. म्हणूनच सध्याची युवा पिढी आपली शेती सोडून गावाबाहेर पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी जाऊन मिळेल ते काम अगदी कमी मोबदल्यात करत आहेत. गेल्या काही दिवसात शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जात आहे. दिवसरात्र उन्हात काबाडकष्ट करून आणलेले पीक बाजारात कवडीमोल भावाने विकले जात आहे. 

भांडवली खर्च सोडाच साधा तोडणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना  आपली उभी पिके सोडून दिल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. एकूणच सगळ्या बाजूंनी शेतीची पडझड झाल्याने अनिश्चित शेती व्यवसायाकडे युवा पिढी कानाडोळा करून नोकरीला प्राधान्य देत आहे.सरकारची चुकीची धोरणे, शेतीचा वाढता खर्च, निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतीतून निश्चित उत्पादन निघण्याची आशा धूसर होत आहे. याचा परिणाम म्हणून परिसरातील युवा पिढी शेतीकडे कानाडोळा करून नोकरीकडे वळत आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे भाई अ‍ॅड. नारायण गोले पाटील यांनी सांगितले.

सेंद्रिय शेती करावी वेळेचे योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सेंद्रिय शेती केल्यास चांगले पीक घेता येईल. - आर. जे. शेख, कृषी सहाय्यक

 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रMONEYपैसा