शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी बचाओ’ जिंकली; मुलींचा जन्मदर वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:37 IST

जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले जातात. यासाठी लाखो ...

जिल्ह्यात आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले जातात. यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तसेच ग्रामीण व शहरी भागात जनजागृतीही केली जाते. याचा काही प्रमाणात फायदा होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०१५-१६ साली जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ८९८ एवढा होता. आता तो वाढून ९४६ वर पोहोचला आहे. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी मुलांची बरोबरी करण्यासाठी सर्वांनाच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. नागरिकांनीही मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

--

लिंगनिदान केल्यास कारवाई

काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा स्त्री भ्रूण हत्येमुळे बदनाम झाला होता. त्यानंतर पीसीपीएनडीटी कायदा लागू केला. लिंगनिदान करणाऱ्यांसह करून घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. तेव्हापासून आतापर्यंत तरी एकही कारवाई झालेली नाही. लिंगनिदान बंद झाल्यानेच जन्मदर ८९८ वरून ९४६ वर पोहोचला आहे.

---

मुलगा आणि मुलगी दुजाभाव करू नका, याबाबत जनजागृती केली जाते. जन्मदर बरोबर करण्यासाठी आमच्याकडून पूर्ण प्रयत्न सुरूच आहेत, तसेच लिंगनिदान करणाऱ्यांसाठीही शासनाने कडक नियम केलेले आहेत. त्याचाही फायदा होत आहे. नागरिकांनीही मनातील गैरसमज दूर करणे गरजेचे आहे.

डॉ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

--

१) हजार मुलांमागे मुली किती?

२०१५- १६ : ८९८

२०१६-१७ : ९२७

२०१७-१८ : ९३६

२०१८-१९ : ९६१

२०१९-२० : ९४७

२०२०-२१ : ९२८

२०२१ (ऑगस्टपर्यंत) - ९४६

२) मुला-मुलींच्या जन्माची संख्या

२०१५- १६ : ४२६८१

२०१६-१७ : ४५०६४

२०१७-१८ : ४७२९७

२०१८-१९ : ४६७८९

२०१९-२० : ४६०३७

२०२०-२१ : ४५६८४

२०२१ (ऑगस्टपर्यंत) - १७४६३

210921\21_2_bed_7_21092021_14.jpeg

डॉ.रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड