शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:29 IST

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती.

- अनिल लगडबीड : राज्यातील नाट्यमय घडामोडींनंतर गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची निवड झाली, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मंत्रिमंडळात बीड जिल्ह्यातून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना लॉटरी लागणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी जिल्ह्यात मराठा कार्ड म्हणून विधान परिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस, गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती. भाजपच्या राज्याच्या कोअर कमिटीतही त्या होत्या. राज्यात मुंडे या ओबीसींच्या भाजपमधील प्रमुख मास लीडर आहेत. त्यांना मंत्रिपदाचा अनुभवही आहे. २०१९ निवडणुकीत मुंडे यांचा परळीतून पराभव झाला. या काळात फडणवीस यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना बीड जिल्ह्यात राजकीय बळ दिले. या कारणामुळे फडणवीस व मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. यामुळे मुंडे यांच्या पराभवाला फडणवीसदेखील कारणीभूत असल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण झाली होती. यानंतर मुंडे या कोअर कमिटीतून बाहेर पडल्या.

यानंतर त्यांनी भगवान भक्तिगड आणि गोपीनाथ गडावरून पदापेक्षा लोकांमध्ये काम करण्यात रस असल्याचे सांगितले. त्यांना मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीसपद मिळाले. राज्यसभा, विधानसभेत संधी मिळेल, अशी अपेक्षा मुंडे समर्थकांना होती; पण तेथेही त्यांना डावलल्याने समर्थकांनी मोठा संताप व्यक्त केला; परंतु त्यांनी मौन बाळगून पक्षाचे काम चालू ठेवले. भाजपच्या बळकटीसाठी मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. ओबीसी आरक्षणावर महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये मुंडे आघाडीवर दिसल्या. कोअर कमिटीच्या बैठकीसही त्या उपस्थित होत्या.

धस, पवार दावेदारपंकजा मुंडे या विधानसभा, विधान परिषदेच्या सध्या सदस्य नाहीत. यामुळे नव्या मंत्रिमंडळात आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वी राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी जिल्ह्यातील तीन नगरपंचायत निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला. गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नावाचीही चर्चा कार्यकर्त्यांत सुरू आहे. पवार हे दोन वेळा निवडून आले आहेत. यामुळे त्यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेSuresh Dhasसुरेश धसBJPभाजपाBeedबीड