शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"; सुप्रिया सुळेंचा मस्साजोगमध्ये निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:08 IST

मस्साजोग ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला.

मस्साजोग (बीड): मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. अजून एक आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी दिवंगत सरपंच देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई आदि कुटुंबीयांनी खा. सुळे यांच्यासोबत संवाद साधला. देशमुख यांच्या आईने मारेकऱ्यास माझ्या मुलास जसे मारले तशीच शिक्षा झाली पाहिजे, असे म्हणत हंबरडा फोडला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते. देशमुख कुटुंबीयांनी हत्येच्या दिवशीच संपूर्ण घटनाक्रम खा. सुळे यांना सांगत एक आरोपी अद्यापही फरार असल्याबाबत संताप व्यक्त केला.

देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी इथे भाषण करायला आलेली नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले आहे. वैभवी कोणाची तरी लेक आहे, मीही कोणाची तरी लेक आहे. आपल्या मूलाचे निधन आईसाठी सर्वांत मोठं दु:ख आहे. मी यापूर्वी माझ्या मावशीच्या मुलाला लहान वयात गमावलं आहे. त्या घटनेला २०-२५ वर्षे झाली असली तरी माझी मावशी आजही सावरू शकलेली नाही."

"माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार"सुप्रिया सुळे यांनी यावेळी भावनिक होऊन सांगितले की, "या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढा देणार आहे. कोण जबाबदारी घेतो किंवा घेत नाही, याची मला पर्वा नाही. माणुसकीच्या नात्याने हा लढा मी थांबवणार नाही." यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागरही उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेलसुळे पुढे म्हणाल्या, "माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या प्रकरणात आठ दिवसांत न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे. मी महाराष्ट्रातील महिला म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि न्याय मागेल." देशमुख हत्येप्रकरणात न्याय न मिळाल्यास सत्तेचा उपयोग काय, असा सवाल करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सत्याचाच विजय झाला पाहिजे. सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे.मी कोणाशीही तडजोड करणार नाही." असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेते सुरेश धस यांना टोला लगावला.

"न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही"बीड जिल्ह्याचा अभिमान आम्हाला आहे, पण काही लोकांनी जिल्ह्याचे नाव बदनाम केले आहे. आता महिलांनी पुढे येऊन लढा द्यावा, आवश्यकता पडल्यास लाटणं हाती घ्यावं, असे आवाहन सुळे यांनी केले. तसेच, देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे ठाम आश्वासनही त्यांनी दिले. या प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचेही सुळे यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन न करण्याचे आवाहन करत, "तुमचा लढा आम्ही लढू," असा विश्वासही त्यांनी दिला.

टॅग्स :Beedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीSupriya Suleसुप्रिया सुळे