शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

विमा कंपन्यांची तुंबडी भरण्यासाठी पीक विमा काढायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

मागील हंगामातील विमा रक्कम देण्याची मागणी : विमा उतरवणाऱ्यांची संख्या ६ लाखांनी घटली लोकमत न्यूज नेटवर्क बीड : दरवर्षी ...

मागील हंगामातील विमा रक्कम देण्याची मागणी : विमा उतरवणाऱ्यांची संख्या ६ लाखांनी घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मोठ्या आशेने शेतकरी पीक विमा भरतात. मात्र मागील दोन वर्षापासून विमा रक्कम मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा भरणाऱ्या ६ लाख शेतकरी सभासदांची संख्या घटली आहे. मागील वर्षी तर फक्त २० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याप्रमाणे विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, या मागणीसाठी विविध संघटना आंदोलन करीत आहेत.

..

फक्त २० हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई

जिल्ह्यात २०२० खरीप हंगामात भारतीय कृषी विमा कंपनीकडे १७ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी फक्त २० हजार ५३० जणांना भरपाई मिळाली होती.

शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून कंपनीला ७९८ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला होता.

त्यापैकी फक्त २० हजार ५९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४६ लाख नुकसानभरपाईपोटी मिळाले होते.

...

मागील वर्षीच्या तुलनेत विम्यासाठी कमी अर्ज

मागील वर्षी - १७५९००० यावर्षी ११५९३९२ ७४६०१५ एकूण खरीप क्षेत्र

विमा उतरवणारे शेतकरी सभासद ११५९३९२ शेतकऱ्याचा हप्ता ४३१८५३९१२ राज्य हप्ता ३०२७८०३९४२ केंद्र हप्ता २४५६०२५९६४ विमा क्षेत्र ४४८६८७ हेक्टर

विमा संरक्षण रक्कम १८४३ कोटी २४ लाख ९८ हजार ४०० रुपये

...

कृषी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

पावसाचे आगमन वेळेवर झाले असून, पेरणी व उगवण क्षमता देखील उत्तम असल्यामुळे पिकांची परिस्थिती यावर्षी चांगली आहे. त्यामुळे धोका असल्याचे दिसून आले नाही. या कारणामुळे पीकविमा उतरवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.

.....

मागील वर्षी शासनाच्या पंचनाम्याप्रमाणे विमा द्यावा

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पीक काढणीला आलेले असताना गारपीट झाल्यामुळे हातचे पीक गेले होते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार पीक विमा कंपनीने रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी अन्यथा आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

-कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष.

...

मागील दोन वर्षापासून जवळपास २० हजार रुपये पिकांच्या विम्यापोटी भरले आहेत. मात्र, दोन्ही नुकसान होऊन देखील लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी विमा उतरवला नाही. पाऊस पण चांगला पडला असून,पिके जोमात आहेत.

-सतीश जगताप, शेतकरी.