शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

विमा कंपन्यांची तुंबडी भरण्यासाठी पीक विमा काढायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST

मागील हंगामातील विमा रक्कम देण्याची मागणी : विमा उतरवणाऱ्यांची संख्या ६ लाखांनी घटली लोकमत न्यूज नेटवर्क बीड : दरवर्षी ...

मागील हंगामातील विमा रक्कम देण्याची मागणी : विमा उतरवणाऱ्यांची संख्या ६ लाखांनी घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : दरवर्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मोठ्या आशेने शेतकरी पीक विमा भरतात. मात्र मागील दोन वर्षापासून विमा रक्कम मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा भरणाऱ्या ६ लाख शेतकरी सभासदांची संख्या घटली आहे. मागील वर्षी तर फक्त २० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून, प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याप्रमाणे विमा कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, या मागणीसाठी विविध संघटना आंदोलन करीत आहेत.

..

फक्त २० हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई

जिल्ह्यात २०२० खरीप हंगामात भारतीय कृषी विमा कंपनीकडे १७ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी फक्त २० हजार ५३० जणांना भरपाई मिळाली होती.

शेतकरी, राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून कंपनीला ७९८ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला होता.

त्यापैकी फक्त २० हजार ५९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४६ लाख नुकसानभरपाईपोटी मिळाले होते.

...

मागील वर्षीच्या तुलनेत विम्यासाठी कमी अर्ज

मागील वर्षी - १७५९००० यावर्षी ११५९३९२ ७४६०१५ एकूण खरीप क्षेत्र

विमा उतरवणारे शेतकरी सभासद ११५९३९२ शेतकऱ्याचा हप्ता ४३१८५३९१२ राज्य हप्ता ३०२७८०३९४२ केंद्र हप्ता २४५६०२५९६४ विमा क्षेत्र ४४८६८७ हेक्टर

विमा संरक्षण रक्कम १८४३ कोटी २४ लाख ९८ हजार ४०० रुपये

...

कृषी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

पावसाचे आगमन वेळेवर झाले असून, पेरणी व उगवण क्षमता देखील उत्तम असल्यामुळे पिकांची परिस्थिती यावर्षी चांगली आहे. त्यामुळे धोका असल्याचे दिसून आले नाही. या कारणामुळे पीकविमा उतरवणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, बीड.

.....

मागील वर्षी शासनाच्या पंचनाम्याप्रमाणे विमा द्यावा

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पीक काढणीला आलेले असताना गारपीट झाल्यामुळे हातचे पीक गेले होते. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार पीक विमा कंपनीने रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी अन्यथा आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

-कुलदीप करपे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष.

...

मागील दोन वर्षापासून जवळपास २० हजार रुपये पिकांच्या विम्यापोटी भरले आहेत. मात्र, दोन्ही नुकसान होऊन देखील लाभ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षी विमा उतरवला नाही. पाऊस पण चांगला पडला असून,पिके जोमात आहेत.

-सतीश जगताप, शेतकरी.