शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाळू चोरी प्रकरणास अभय कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:47 IST

वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्दे१० ते १२ गुन्हे दाखल : पोलिसांकडून तपास संथ गतीने, काही गुन्हे दीड वर्षापासून प्रलंबित

बीड : वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये प्रशासनाकडून देखील बदनामी प्रकरणी नोटीस देण्याची तयारी केली आहे. मात्र या प्रकरणात सखोल चौकशी होत नाही. या वाळू चोरी प्रकरणाला अभय कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरीसंदर्भात बैठक घेऊन अवैध वाळू चोरी थांवण्यासंदर्भात सूचना केल्या केल्या होत्या, यावेळी बैठकीमध्ये एक पोलीस अधिकारी व वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांच्यात बाचाबाची झाली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.त्यानंतर वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात हप्त्याच्या रेटकार्डसह निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर बदनामी प्रकरणी नोटीस देण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली होती. त्यानंतर वाहतूकदार व ठेकेदार यांच्याकडून हप्ता कोणत्या अधिकाऱ्यांना दिला जायचा याचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र, त्यानंतर देखील निवेदनाची दखल घ्यायची तरी अडचण आणि नाही घेतली तरी अडचण अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे. निवेदनानुसार कारवाई करायची तर कारवाईची सुरुवात कोणापासून करायची आणि कोणाकोणावर कारवाई करावी हा प्रश्न देखील कायम आहे.निवेदनात ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे, ते कधीपासून एकाच भागात कार्यरत आहेत? या भागातून अवैध वाळू वाहतूक होत असताना हे लोक काय करत होते? याची तरी चौकशी प्रशासन करणार आहे का? किंवा वाळू वाहतूकदारांना पुरावे मागणार आहे का? वाळूच्या अवैध वाहतूक, साठेबाजीची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी या सर्वांची असते, मग यात कोणी कर्तव्यातकसूर केली आहे हे तरी तपासले जाणार आहे का ? हे सारे प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पोलिसांचा तपास धिम्यागतीने का ?वाळू वाहतूकदारांच्या निवेदनानंतर पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घेतला आहे. पोलीस अधीक्षकांनी एका ठाणेप्रमुखासह काही कर्मचाºयांना नियंत्रण कक्षाशी जोडले आहे, मात्र या सर्व प्रकरणात वाळूशी संबंधित गुन्ह्याच्या तपासातील पोलिसांची दिरंगाई देखील दिसून येत आहे.विशेष म्हणजे मागील एक दीड वर्षात वाळूच्या अवैध वाहतूक, साठेबाजी , कर्मचाºयांवर हल्ले अशा स्वरुपाचे गेवराई, माजलगाव, आष्टी , शिरूर , बीड आदी पोलीस ठाण्यांमध्ये १०-१२ गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या नगण्य आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर एक ते दीड वर्ष उलटूनही अनेक गुन्ह्यात कुठलीही कारवाई झालेली नाही, तसे तपासात दिरंगाई का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभागBeed policeबीड पोलीस