शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

वाळू चोरी प्रकरणास अभय कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 23:47 IST

वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्दे१० ते १२ गुन्हे दाखल : पोलिसांकडून तपास संथ गतीने, काही गुन्हे दीड वर्षापासून प्रलंबित

बीड : वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये प्रशासनाकडून देखील बदनामी प्रकरणी नोटीस देण्याची तयारी केली आहे. मात्र या प्रकरणात सखोल चौकशी होत नाही. या वाळू चोरी प्रकरणाला अभय कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरीसंदर्भात बैठक घेऊन अवैध वाळू चोरी थांवण्यासंदर्भात सूचना केल्या केल्या होत्या, यावेळी बैठकीमध्ये एक पोलीस अधिकारी व वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांच्यात बाचाबाची झाली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.त्यानंतर वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात हप्त्याच्या रेटकार्डसह निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर बदनामी प्रकरणी नोटीस देण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली होती. त्यानंतर वाहतूकदार व ठेकेदार यांच्याकडून हप्ता कोणत्या अधिकाऱ्यांना दिला जायचा याचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र, त्यानंतर देखील निवेदनाची दखल घ्यायची तरी अडचण आणि नाही घेतली तरी अडचण अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे. निवेदनानुसार कारवाई करायची तर कारवाईची सुरुवात कोणापासून करायची आणि कोणाकोणावर कारवाई करावी हा प्रश्न देखील कायम आहे.निवेदनात ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे, ते कधीपासून एकाच भागात कार्यरत आहेत? या भागातून अवैध वाळू वाहतूक होत असताना हे लोक काय करत होते? याची तरी चौकशी प्रशासन करणार आहे का? किंवा वाळू वाहतूकदारांना पुरावे मागणार आहे का? वाळूच्या अवैध वाहतूक, साठेबाजीची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी या सर्वांची असते, मग यात कोणी कर्तव्यातकसूर केली आहे हे तरी तपासले जाणार आहे का ? हे सारे प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पोलिसांचा तपास धिम्यागतीने का ?वाळू वाहतूकदारांच्या निवेदनानंतर पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घेतला आहे. पोलीस अधीक्षकांनी एका ठाणेप्रमुखासह काही कर्मचाºयांना नियंत्रण कक्षाशी जोडले आहे, मात्र या सर्व प्रकरणात वाळूशी संबंधित गुन्ह्याच्या तपासातील पोलिसांची दिरंगाई देखील दिसून येत आहे.विशेष म्हणजे मागील एक दीड वर्षात वाळूच्या अवैध वाहतूक, साठेबाजी , कर्मचाºयांवर हल्ले अशा स्वरुपाचे गेवराई, माजलगाव, आष्टी , शिरूर , बीड आदी पोलीस ठाण्यांमध्ये १०-१२ गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या नगण्य आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर एक ते दीड वर्ष उलटूनही अनेक गुन्ह्यात कुठलीही कारवाई झालेली नाही, तसे तपासात दिरंगाई का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभागBeed policeबीड पोलीस