शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

जुने घोंगडे भिजत असताना, नवीन योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:20 AM

जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा योजनांचे घोंगडे भीजत असताना नवीन योजना मंजूर झाल्या आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना : बीड जिल्ह्यात जुन्या २५६ योजनांची कामे अर्धवट, नवीन २४९ योजना मंजूर

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा योजनांचे घोंगडे भीजत असताना नवीन योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना प्रशासनाच्या वतीने किती पारदर्शक पद्धतिने राबवल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांच्या माध्यमातून यापुर्वी २५६ योजना राबवण्यात आल्या होत्या, मात्र त्यापैकी बहुतांश योजना अर्धवट असून, मोठ्या प्रमाणात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. यापैकी अनेक प्रकरणामध्ये गुन्हे देखील दाखल झाले होते. मात्र, या प्रकरणांची चौकशी अंत्यंत संथ गतीने सुरू असून कुठल्याही प्रकराची कारवाई केली गेली नाही.जुनी प्रकरणे ताजी असताना यावर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून २४९ योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या वतीने ८६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनांचा फायदा जवळपास ३०० वाड्या वस्त्या व गावांना होणार आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांप्रमाणे या योजना रबवल्या जाऊ नयेत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.प्रत्येक गावामध्ये जलसाठा उपलब्ध असलेल्या ठिकाणावरुन नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही एक महत्त्वाची योजना आहे, मात्र या योजनेअंतर्गर यापूर्वी गाव पातळीवर समिती नेमून कामे करण्यात आली होती. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. यापैकी ४२ गावातील प्रकरणांची कायदेशीर चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरु असून, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा संशय कामे न झालेल्या गावताली नागरिकांनी व्यक्त केला आहे.यापर्वीच्या योजना अर्धवट असताना नवीन योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी ही कामे ई-टेंडरच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते एस. यू. खंडारे यांनी दिली.२५६ योजना अपूर्णचयापुर्वी जिल्ह्यात २५६ योजना राष्ट्रीय पेयजल योजनांच्या माध्यमातून रबावण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी ४२ योजना प्रगतीपथावर आहेत, १५४ योजना आर्थिक कारणांमुळे बंद आहेत, तर ६० योजनांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे यापैकी एकही योजना पूर्ण नसून, काही योजनांची भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी सुरु आहे उर्वरित कामे रखडली आहेत.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी