सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड: नियमात होणाऱ्या कामांसाठीही पैसे घेऊन कोट्यवधींची माया जमवली. राज्यातील अशा नऊ लाचखोरांवर अपसंपदा व भ्रष्टाचार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यांची चौकशी होऊन मालमत्ता गोठविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रस्तावही पाठविले. परंतु चार वर्षांपासून ते धूळखात पडून आहेत. गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.