शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये दडले काय? सरपंच हत्येप्रकरणी तिघांना १३ दिवसांची पोलिस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:34 IST

खंडणीप्रकरणी विष्णू चाटेला ४ दिवसांची पोलिस कोठडी

केज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूर हत्या केल्याच्या आरोपातील विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत तर अन्य जयराम चाटे, महेश केदार व प्रतीक घुले या तीन आरोपींना १८ जानेवारीपर्यंत १३ दिवस पोलिस कोठडीचे आदेश केज न्यायालयाचे प्रमुख न्या. एस.व्ही. पावसकर यांनी सोमवारी दिले. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला अटक करून त्याची पोलिस कोठडी घेतली असली तरी त्याने अद्याप आपला मोबाईल तपास अधिकाऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे या मोबाईलमध्ये दडले काय? अशी चर्चा न्यायालय परिसरात होत होती.

मस्साजोग येथील सरपंच हत्येप्रकरणी अटकेत असलेले जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार व खंडणीप्रकरणी अटकेत असलेला विष्णू चाटे या चारही आरोपींना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केज येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया केल्यानंतर दुपारी ३.०५ वाजता चौघांना केज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयात सरकारी पक्षाचे वकील व आरोपीचे वकील यांनी आपापली बाजू मांडल्यानंतर केज येथील मुख्य न्या. एस.व्ही. पावसकर यांनी जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार या तिघांना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड. अनंत तिडके यांनी बाजू मांडली.

विष्णू चाटेला ४ दिवसांची वाढीव कोठडीकेज तालुक्यातील मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीतील अधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटे याला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेशही मुख्य न्या. एस.व्ही. पावसकर यांनी दिले. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने माजलगाव येथील सरकारी वकील ॲड. जितेंद्र शिंदे यांनी तर आरोपीच्या वतीने ॲड. राहुल मुंडे यांनी बाजू मांडली.

दोन तास मांडली बाजूसरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडताना सरपंच हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, या प्रकरणात ऐनवेळी काही कलम वाढविण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरलेली सर्व हत्यारे जप्त करण्यासाठी तसेच या गुन्ह्यातील पाळेमुळे शोधण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तर आरोपीच्या वकिलाने या प्रकरणी राजकीय व सामाजिक दबाव वाढत असल्यामुळे दबावाखाली सर्व काही चालू आहे. २० ते २५ दिवस चौकशी अधिकाऱ्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून आता पोलिस कोठडीची गरज नसल्याची बाजू ॲड. अनंत तिडके व ॲड. राहुल मुंडे यांनी मांडली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्या. एस.व्ही. पावसकर यांनी पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी