शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

माझ्या बाबांचा गुन्हा कोणता? अश्रू ढाळत वैभवीच्या सवालाने गहिवरला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 06:22 IST

धनंजय देशमुखांनी मागितली न्यायाची भीक

बारामती : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसह, घटनेच्या निषेधार्थ बारामतीत रविवारी सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी देशमुख यांची मुलगी वैभवी हिने रडत रडत केलेल्या भाषणाने बारामतीकर गहिवरले. माझ्या वडिलांचा गुन्हा कोणता?, त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही, तर रस्त्याने जाताना धक्का लागला तरी खून होईल, अशी भीती तिने व्यक्त केली. तर पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला.

धनंजय देशमुख म्हणाले, मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना न्यायाची भीक मागत आहे. २८ मे २०२४ रोजी या पहिल्या घटनेची सुरुवात झाली. अवादा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे अपहरण झाले. कंपनीने २९ तारखेला एफआयआर दाखल केला. परंतु दोघांनी अपहरण केले होते. मात्र, त्यात एकाच व्यक्तीचे नाव आहे. त्याचा कुठेही तपास झाला नाही. आरोपींना कळून चुकले आपले काहीही होत नाही. त्याच अनुषंगाने सूत्रधार वाल्मीक कराह याने सूचना दिल्या. त्याप्रमाणे २९ नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली. मात्र, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.

वडिलांना एवढी क्रूर शिक्षा कशासाठी? 

वैभवी देशमुख हिने वडिलांसाठी न्याय देण्याची मागणी केली. माझ्या वडिलांची हत्या खंडणीतून झाली. ही खंडणी कोणासाठी जात होती, कोणासाठी ठेवली होती, असा सवाल तिने केला. माझ्या वडिलांनी नेमका काय गुन्हा केला होता. मागासवर्गातील बांधवाला वाचविण्यासाठी गेलेल्या माझ्या वडिलांना एवढी क्रूर शिक्षा कशासाठी, असे घडल्यास कोणीच दुसऱ्यासाठी पाऊल उचलणार नाही, अशी भीती तिने व्यक्त केली.

माझे वडील संवेदनशील मनाचे

वैभवी म्हणाली, आमचं घर माळवदाच आहे. एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या. मात्र, माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकू दिली नाही. चिकटपट्टी लावून मुंग्या खाली येण्यापासून थांबविल्या. एवढ्या संवेदनशील मनाचे माझे वडील होते. हे सांगताना वैभवीचा अश्रूचा बांध फुटला. मला माझ्या वडिलांचा शेवटचं भेटायला मिळालं नाही, याचे मला खूप दुख आहे.

राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार

धनंजय देशमुख म्हणाले, ६ डिसेंबरला आठ जण कंपनीत आले. परत एकास अमानुषपणे मारण्यास सुरुवात केली. गावातील एकाने संतोष आण्णांना फोन केला. तो सोडवायला गेला. भांडण सोडविताना त्यांना मारले. त्या विरोधात अशोक सोनवणे हा  पोलिसात तक्रार देण्यासाठी भीक मागत होता. राजकीय पाठबळामुळे एफआयआर घेतला नाही. आताही तिथे वातावरण भयावह आहे. प्रकरणातील राजकीय हस्तक्षेपाचे पुरावे आहेत. ते लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना देणार असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीwalmik karadवाल्मीक कराड