शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मदत करणारा अदृश्य हात आपल्यालाही पुढे करता आला तर? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:21 IST

एकट्याने काहीच साध्य होणार नाही, म्हणून `एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

एक माणूस वाळवंटातून चालत प्रवास करत असतो. दूर दूरवर त्याला वाळूशिवाय काहीच दिसत नाही. जवळचे पाणीदेखील संपलेले असते. त्याला कंठशोष पडलेला असतो. पाणी मिळण्याची थोडीही आशा दिसत नाही. तरी तो चालत असतो. 

चालता चालता नजरेच्या टप्प्यावर त्याला एक झोपडी दिसते. त्याची आशा पल्लवित होते. पण, हा मृगजळासारखा भास तर नाही ना? या विचाराने तो झोपडीच्या दिशेने चालू लागतो. जस जसा जवळ जातो, तिथे झोपडी अस्तित्त्वात असल्याचे त्याच्या लक्षात येते. 

तो देवाचे आभार मानतो. त्याच्या पावलांना गती येते. तो भरभर चालू लागतो. तिथे पाणी नक्कीच मिळणार याची त्याला खात्री वाटते. झोपडीजवळ पोहोचल्यावर आत डोकावून पाहतो, तर आत कोणीच नसते. रिकामी झोपडी पण आतमध्ये एक पाण्याचा पंप असतो. बाकी काही नसले, तरी महत्त्वाची गोष्ट आहे, याचा त्याला आनंद होतो. 

तो पंप चालवून पाहतो, पण पाणीच येत नाही. तो निराश होतो. जमिनीवर उताणा पडतो. तर छताकडे त्याचे लक्ष जाते. छताला पाण्याची बाटली लटकवलेली असते. तो लगेच उठतो आणि ते बाटलीतले पाणी तोंडाला लावणार तोच बाटलीच्या खाली चिकटवलेली चिठ्ठी त्याला दिसते. तो ती उघडून वाचतो. त्यात लिहिलेले असते, ज्याला पाणी हवे असेल, त्याने या बाटलीतले पाणी पंपात ओतावे, पंपातून पाणी सुरू होईल व पाणी पिऊन झाल्यावर बाटली भरून या चिठ्ठीसह छताला बाटली टांगून ठेवावी.

तो विचार करतो, पंपात पाणी ओतले, पण पाणीच आले नाही तर, हातात आहे तेही पाणी मिळणार नाही. शेवटी तो देवाचे नाव घेऊन पाणी पंपात ओततो आणि हँड पंप जोरजोरात वर खाली करतो. काय आश्चर्य, नळातून गारेगार पाणी येऊ लागते. ते पाण पिऊन त्याची तहान भागते. तो चिठ्ठीत दिल्याप्रमाणे एक बाटली पाणी भरून छताला बाटली अडकवून झोपडीतून बाहेर निघत असतो. तिथे दारावर त्याला आणखी एक चिठ्ठी दिसते, त्यात वाळवंटातून बाहेर पडण्याचा नकाशा दिलेला असतो. तो मनुष्य पुन्हा देवाचे आणि ही मदत करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानतो. वाट चुवूâ नये, म्हणून तो नकाशा आपल्या खिशातून नेऊ पाहतो. परंतु त्याक्षणी त्याला जाणीव होते, जशी आपल्यासाठी अज्ञात व्यक्तीने ही मदत केली, तशी आपल्यामुळेही अज्ञात व्यक्तीला मदत होणार असेल, तर आपण हा नकाशा इथेच सांभाळून ठेवला पाहिजे.

गोष्टीचे तात्पर्य हेच, की आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयींमागे अज्ञात हातांनी केलेली मेहनत कारणीभूत असते. आपल्यालाही कोणासाठी अज्ञात व्यक्ती बनून कोणाच्या मदतीचे कारण होता आले पाहिजे. शेवटी काय, तर एकट्याने काहीच साध्य होणार नाही, म्हणून `एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'