शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मदत करणारा अदृश्य हात आपल्यालाही पुढे करता आला तर? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 14:21 IST

एकट्याने काहीच साध्य होणार नाही, म्हणून `एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'

एक माणूस वाळवंटातून चालत प्रवास करत असतो. दूर दूरवर त्याला वाळूशिवाय काहीच दिसत नाही. जवळचे पाणीदेखील संपलेले असते. त्याला कंठशोष पडलेला असतो. पाणी मिळण्याची थोडीही आशा दिसत नाही. तरी तो चालत असतो. 

चालता चालता नजरेच्या टप्प्यावर त्याला एक झोपडी दिसते. त्याची आशा पल्लवित होते. पण, हा मृगजळासारखा भास तर नाही ना? या विचाराने तो झोपडीच्या दिशेने चालू लागतो. जस जसा जवळ जातो, तिथे झोपडी अस्तित्त्वात असल्याचे त्याच्या लक्षात येते. 

तो देवाचे आभार मानतो. त्याच्या पावलांना गती येते. तो भरभर चालू लागतो. तिथे पाणी नक्कीच मिळणार याची त्याला खात्री वाटते. झोपडीजवळ पोहोचल्यावर आत डोकावून पाहतो, तर आत कोणीच नसते. रिकामी झोपडी पण आतमध्ये एक पाण्याचा पंप असतो. बाकी काही नसले, तरी महत्त्वाची गोष्ट आहे, याचा त्याला आनंद होतो. 

तो पंप चालवून पाहतो, पण पाणीच येत नाही. तो निराश होतो. जमिनीवर उताणा पडतो. तर छताकडे त्याचे लक्ष जाते. छताला पाण्याची बाटली लटकवलेली असते. तो लगेच उठतो आणि ते बाटलीतले पाणी तोंडाला लावणार तोच बाटलीच्या खाली चिकटवलेली चिठ्ठी त्याला दिसते. तो ती उघडून वाचतो. त्यात लिहिलेले असते, ज्याला पाणी हवे असेल, त्याने या बाटलीतले पाणी पंपात ओतावे, पंपातून पाणी सुरू होईल व पाणी पिऊन झाल्यावर बाटली भरून या चिठ्ठीसह छताला बाटली टांगून ठेवावी.

तो विचार करतो, पंपात पाणी ओतले, पण पाणीच आले नाही तर, हातात आहे तेही पाणी मिळणार नाही. शेवटी तो देवाचे नाव घेऊन पाणी पंपात ओततो आणि हँड पंप जोरजोरात वर खाली करतो. काय आश्चर्य, नळातून गारेगार पाणी येऊ लागते. ते पाण पिऊन त्याची तहान भागते. तो चिठ्ठीत दिल्याप्रमाणे एक बाटली पाणी भरून छताला बाटली अडकवून झोपडीतून बाहेर निघत असतो. तिथे दारावर त्याला आणखी एक चिठ्ठी दिसते, त्यात वाळवंटातून बाहेर पडण्याचा नकाशा दिलेला असतो. तो मनुष्य पुन्हा देवाचे आणि ही मदत करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानतो. वाट चुवूâ नये, म्हणून तो नकाशा आपल्या खिशातून नेऊ पाहतो. परंतु त्याक्षणी त्याला जाणीव होते, जशी आपल्यासाठी अज्ञात व्यक्तीने ही मदत केली, तशी आपल्यामुळेही अज्ञात व्यक्तीला मदत होणार असेल, तर आपण हा नकाशा इथेच सांभाळून ठेवला पाहिजे.

गोष्टीचे तात्पर्य हेच, की आपल्याला मिळणाऱ्या सुखसोयींमागे अज्ञात हातांनी केलेली मेहनत कारणीभूत असते. आपल्यालाही कोणासाठी अज्ञात व्यक्ती बनून कोणाच्या मदतीचे कारण होता आले पाहिजे. शेवटी काय, तर एकट्याने काहीच साध्य होणार नाही, म्हणून `एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!'