शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जातीच्या शिड्या वापरून मंत्री झालेल्यांनी काय दिले?- मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:16 IST

यापूर्वी माळी समाजाचे मंत्री झाले होते त्यांनी समाजाला काय दिले असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संत सावतामाळी यांच्या अरण संस्थेचा विकास करण्यासाठी मी प्रमाणिकपणे सारी शक्ती पणाला लावणार आहे. माळी समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मात्र यापूर्वी माळी समाजाचे मंत्री झाले होते त्यांनी समाजाला काय दिले असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. त्या सावता परिषदेच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त माळी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.यावेळी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ.संगीता ठोंबरे, शिवसेनेचे शंकर बोरकर, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे यांच्यासह सावता परिषदेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थितीती होती. माळी समाजातील प्रलंबीत मागण्या व समाजाच्या पुढील वाटचालीसाठी सावता परिषदेच्या वतीने हा मेळाव्याचे आयोजन बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी माळी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पदाधिका-यांनी व्यक्त केली, तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास सरकार खाली खेचण्याची ताकद माळी समाजात असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सरकार खाली खेचण्याच्या वक्तव्यावर बोलताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी अरणला गेले त्यावेळी तिथे जाण्यासाठी रस्ता देखील चांगला नव्हता, मी साडेतीन कोटीचा निधी तिथे दिला आहे. समाजाचा विकास करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळे सरकार खाली खेचण्याची भाषा योग्य नाही, सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहा, भाजप सरकारमध्ये समाजाचे चार आमदार आहेत. त्यामुळे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ताकद पणाला लावली जाईल, तसेच इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे अरणला देखील १०० कोटींचा निधी विकासासाठी देण्यात येणार आहे. त्याचसोबत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खा.प्रीतम मुंडे, परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, महादेव काळे, शंकर बोरकर यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले.मुंडे यांच्या समक्ष सरकार पाडण्याचा इशारामहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, तसेच ओबीसी आरक्षण कायम राहावे, समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ अदा करण्यात यावे, ओबीसी महामंडळासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अरण तीर्थक्षेत्रासाठी १०० कोटीची तरतूद करण्यात यावी, कल्याण आखाडे यांना मंत्रीपद देण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या, तसेच मागण्या मान्य न झाल्यास सरकार पाडण्याचा इशारा परिषदेच्या पदाधिकाºयांनी पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दिला.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेcommunityसमाजSocialसामाजिक