शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जातीच्या शिड्या वापरून मंत्री झालेल्यांनी काय दिले?- मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:16 IST

यापूर्वी माळी समाजाचे मंत्री झाले होते त्यांनी समाजाला काय दिले असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संत सावतामाळी यांच्या अरण संस्थेचा विकास करण्यासाठी मी प्रमाणिकपणे सारी शक्ती पणाला लावणार आहे. माळी समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, मात्र यापूर्वी माळी समाजाचे मंत्री झाले होते त्यांनी समाजाला काय दिले असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. त्या सावता परिषदेच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनानिमित्त माळी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.यावेळी सावता महाराजांचे वंशज रमेश महाराज वसेकर, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, खा.डॉ.प्रीतम मुंडे, आ.संगीता ठोंबरे, शिवसेनेचे शंकर बोरकर, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे यांच्यासह सावता परिषदेचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थितीती होती. माळी समाजातील प्रलंबीत मागण्या व समाजाच्या पुढील वाटचालीसाठी सावता परिषदेच्या वतीने हा मेळाव्याचे आयोजन बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात गुरुवारी करण्यात आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी माळी समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची खंत पदाधिका-यांनी व्यक्त केली, तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास सरकार खाली खेचण्याची ताकद माळी समाजात असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सरकार खाली खेचण्याच्या वक्तव्यावर बोलताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी अरणला गेले त्यावेळी तिथे जाण्यासाठी रस्ता देखील चांगला नव्हता, मी साडेतीन कोटीचा निधी तिथे दिला आहे. समाजाचा विकास करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. त्यामुळे सरकार खाली खेचण्याची भाषा योग्य नाही, सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहा, भाजप सरकारमध्ये समाजाचे चार आमदार आहेत. त्यामुळे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ताकद पणाला लावली जाईल, तसेच इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे अरणला देखील १०० कोटींचा निधी विकासासाठी देण्यात येणार आहे. त्याचसोबत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खा.प्रीतम मुंडे, परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे, महादेव काळे, शंकर बोरकर यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले.मुंडे यांच्या समक्ष सरकार पाडण्याचा इशारामहात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, तसेच ओबीसी आरक्षण कायम राहावे, समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ अदा करण्यात यावे, ओबीसी महामंडळासाठी निधीची तरतूद करण्यात यावी, अरण तीर्थक्षेत्रासाठी १०० कोटीची तरतूद करण्यात यावी, कल्याण आखाडे यांना मंत्रीपद देण्यात यावे, या मागण्या करण्यात आल्या, तसेच मागण्या मान्य न झाल्यास सरकार पाडण्याचा इशारा परिषदेच्या पदाधिकाºयांनी पंकजा मुंडे व इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दिला.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेcommunityसमाजSocialसामाजिक