शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:29 IST

२१ वर्षीय तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी सोपवली विकासाची दोरी 

- नितीन कांबळेकडा ( बीड) : गावगाड्याच्या निवडणूका ताब्यात घेण्यासाठी आणि सत्ता आपलीच असावी यासाठी अनेकांनी खुप वर्ष घालावी लागतात. पण गावगाडा चालवणे कठीणच. इथे कोणीच कोणाला मेळ बसु देत नसल्याचे आपण अनेकदा पाहतो. परंतु, पण शिक्षण घेत असतांना गावच्या विकासाठी व परिवर्तन घडवून आणण्यासाठी नारीशक्ती पुढे आली. लढली अन् जिंकून देखील आली. वयाच्या २१ व्या वर्षी हातोळण गावच्या सरपंच पदी विराजमान झालेली भारती बाळु मिसाळ असे सरपंच तरूणीचे नाव आहे. विशेष म्हणजे तिने या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान केले.

आष्टी तालुक्यातील शेवटचे टोक असलेले व अहमदनगर सरहद्दीवर असलेले हातोळण ( औरंगपुर ) हे गाव गावची लोकसंख्खा ११०० तर एकुण मतदान ७१८ पैकि ६८४ झाले. ७ सदस्य संख्या तर ८ वा सरपंच आहे. बाबासाहेब मिसाळ हे छत्रपती क्रांती सेना संघटनेचे अध्यक्ष असून ते परिवर्तनवादी चळवळीचे काम करतात. समाजसेवेच्या माध्यमातून गावचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपल्या मुलीला भारतीला राजकारण सक्रिय केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तिला सरपंच पदासाठी उभे केले.

भारती सध्या बारामती येथील शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे. गावच्या विकासासाठी परिवर्तनावादी भुमिका घेऊन ती निवडणूक रिंगणात उतरली आणि बाजी देखील मारली. तिला ३५४ मते मिळाली, २९ मतांनी ती विजयी झाली. अवघ्या २१ व्या वर्षी हातोळण गावची सरपंच होण्याचा मान तिने मिळवला. गावाने तिच्यावर विश्वास टाकला. तेवढ्या ताकतीने हा विश्वास ती पेलवणार देखील असल्याने शाब्बास पोरी मानलं तुला...अशा शब्दांत तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Beedबीडsarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत