शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:12 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सद्यस्थितीत शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दिवभरात ५० ते ६० खेपा केल्या जात आहेत. हद्दवाढ भागात मात्र, आजही पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे सांगण्यात आले.जून संपून जुलैचा पहिला आठवडाही पूर्ण झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात कोठेच वरूणराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडेठाक आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाली येथील बिंदुसरा आणि माजलगाव धरणही कोरडे पडले आहे. सध्या माजलगाव धरणात चर खोदून बीड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.मात्र, मागणीपेक्षा कमी पाणी येत असल्याने शहरात १० ते १५ दिवसानंतर नळाला पाणी येते. त्यामुळे बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, शहरात तरी १५ दिवसाला पाणी येते. मात्र, हद्दवाढ भागात तर पाणीच येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हाच धागा पकडून पालिकेने शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. हे टँकर खासकरून स्वराज्य नगर, सोमेश्वर मंदिर परिसर, संत नामदेव नगर, अंकुश नगर, बार्शी रोड, पिंपरगव्हान रोड आदी भागात आहेत. तसेच जिल्हा रूग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह, वसतीगृह, शाळा आदी ठिकाणीही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सुपरवायझर पी.आर.दुधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकDamधरण