शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीड शहराला १४ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:12 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यात वरूणराजाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. सद्यस्थितीत शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून दिवभरात ५० ते ६० खेपा केल्या जात आहेत. हद्दवाढ भागात मात्र, आजही पाणीपुरवठा विस्कळीतच असल्याचे सांगण्यात आले.जून संपून जुलैचा पहिला आठवडाही पूर्ण झाला. मात्र, अद्यापही जिल्ह्यात कोठेच वरूणराजा मनसोक्त बरसला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडेठाक आहेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाली येथील बिंदुसरा आणि माजलगाव धरणही कोरडे पडले आहे. सध्या माजलगाव धरणात चर खोदून बीड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे.मात्र, मागणीपेक्षा कमी पाणी येत असल्याने शहरात १० ते १५ दिवसानंतर नळाला पाणी येते. त्यामुळे बीडकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, शहरात तरी १५ दिवसाला पाणी येते. मात्र, हद्दवाढ भागात तर पाणीच येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. हाच धागा पकडून पालिकेने शहरात १४ टँकरने पाणीपुरवठा केला आहे. हे टँकर खासकरून स्वराज्य नगर, सोमेश्वर मंदिर परिसर, संत नामदेव नगर, अंकुश नगर, बार्शी रोड, पिंपरगव्हान रोड आदी भागात आहेत. तसेच जिल्हा रूग्णालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा कारागृह, वसतीगृह, शाळा आदी ठिकाणीही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सुपरवायझर पी.आर.दुधाळ यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकDamधरण