शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:03 AM

माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे.

ठळक मुद्देआणखी एका आवर्तनाची गरज : नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यात सोडले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाचीपाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे. मात्र आणखी एका आवर्तनाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.२१ डिसेंबर पासून जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी माजलगाव धरणामध्ये सोडण्यात आल्याने तेवीस दिवसात धरणाची पाणी पातली फूटभर वाढली आहे. जुलै महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्याने येथील माजलगाव धरण मृतसाठ्यातच होते.तालुक्यात हिवाळ्यातही पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रशासनाने उन्हाळ्यात माजलगाव धरणामध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित केले होते. मात्र जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे २१ डिसेंबर पासून पाणी सोडण्यात आले होते.मात्र, सोडलेल्या पाण्याचा अवैध उपसा आणि कॅनॉलला जागोजागी लागलेली गळती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होवून तेवीस दिवस होऊन देखील माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले नसून, धरणाची पाणीपातळी केवळ एक फुटाने वाढली आहे.२४ डिसेंबर रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४२४.७८ मीटर एवढी होती तर पाणीसाठा १०३.६० एवढा होता. तर १४ जानेवारी रोजी पाणी पातळी ४२५.०६ मीटर एवढी असून पाणीसाठा १११.२० दलघमी आहे. आजपर्यंत ९.५४९ दलघमी एवढा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती धरण मुकादम एस.डी कुलकर्णी यांनी दिली. मात्र आलेल्या या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा जरी मिळाला असला तरी देखील पाणीसंकटाची टांगती तलावार माजलगाव, बीड व या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इतर शहरांवर आहे. त्यामुळे अजून एक पाण्याचे आवर्तन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊन उन्हाळ््याच्या दिवसात देखील दिलासा मिळेल.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी