शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:04 IST

माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे.

ठळक मुद्देआणखी एका आवर्तनाची गरज : नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यात सोडले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाचीपाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे. मात्र आणखी एका आवर्तनाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.२१ डिसेंबर पासून जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी माजलगाव धरणामध्ये सोडण्यात आल्याने तेवीस दिवसात धरणाची पाणी पातली फूटभर वाढली आहे. जुलै महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्याने येथील माजलगाव धरण मृतसाठ्यातच होते.तालुक्यात हिवाळ्यातही पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रशासनाने उन्हाळ्यात माजलगाव धरणामध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित केले होते. मात्र जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे २१ डिसेंबर पासून पाणी सोडण्यात आले होते.मात्र, सोडलेल्या पाण्याचा अवैध उपसा आणि कॅनॉलला जागोजागी लागलेली गळती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होवून तेवीस दिवस होऊन देखील माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले नसून, धरणाची पाणीपातळी केवळ एक फुटाने वाढली आहे.२४ डिसेंबर रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४२४.७८ मीटर एवढी होती तर पाणीसाठा १०३.६० एवढा होता. तर १४ जानेवारी रोजी पाणी पातळी ४२५.०६ मीटर एवढी असून पाणीसाठा १११.२० दलघमी आहे. आजपर्यंत ९.५४९ दलघमी एवढा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती धरण मुकादम एस.डी कुलकर्णी यांनी दिली. मात्र आलेल्या या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा जरी मिळाला असला तरी देखील पाणीसंकटाची टांगती तलावार माजलगाव, बीड व या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इतर शहरांवर आहे. त्यामुळे अजून एक पाण्याचे आवर्तन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊन उन्हाळ््याच्या दिवसात देखील दिलासा मिळेल.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी