शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

माजलगाव धरणाची पाणी पातळी फूटभर वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:04 IST

माजलगाव धरणाची पाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे.

ठळक मुद्देआणखी एका आवर्तनाची गरज : नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यात सोडले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव धरणाचीपाणी पातळी मृतसाठ्या खाली गेल्याने बीड व माजलगाव शहराला पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार होणार होती, मात्र नाथसागर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी एक फुटाने वाढली असून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्याता आहे. मात्र आणखी एका आवर्तनाची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.२१ डिसेंबर पासून जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी माजलगाव धरणामध्ये सोडण्यात आल्याने तेवीस दिवसात धरणाची पाणी पातली फूटभर वाढली आहे. जुलै महिन्यापासून पावसानं पाठ फिरवल्याने येथील माजलगाव धरण मृतसाठ्यातच होते.तालुक्यात हिवाळ्यातही पाणी टंचाईच्या झळा जाणवत असल्याने प्रशासनाने उन्हाळ्यात माजलगाव धरणामध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित केले होते. मात्र जायकवाडी धरणातून पैठणच्या उजव्या कालव्याद्वारे २१ डिसेंबर पासून पाणी सोडण्यात आले होते.मात्र, सोडलेल्या पाण्याचा अवैध उपसा आणि कॅनॉलला जागोजागी लागलेली गळती यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होवून तेवीस दिवस होऊन देखील माजलगाव धरण मृतसाठ्याबाहेर आले नसून, धरणाची पाणीपातळी केवळ एक फुटाने वाढली आहे.२४ डिसेंबर रोजी माजलगाव धरणाची पाणीपातळी ४२४.७८ मीटर एवढी होती तर पाणीसाठा १०३.६० एवढा होता. तर १४ जानेवारी रोजी पाणी पातळी ४२५.०६ मीटर एवढी असून पाणीसाठा १११.२० दलघमी आहे. आजपर्यंत ९.५४९ दलघमी एवढा पाणीसाठा वाढला असल्याची माहिती धरण मुकादम एस.डी कुलकर्णी यांनी दिली. मात्र आलेल्या या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा जरी मिळाला असला तरी देखील पाणीसंकटाची टांगती तलावार माजलगाव, बीड व या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या इतर शहरांवर आहे. त्यामुळे अजून एक पाण्याचे आवर्तन करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी होऊन उन्हाळ््याच्या दिवसात देखील दिलासा मिळेल.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी