शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:15 IST

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे.

ठळक मुद्देजल है तो कल है : जलबचतीचा संकल्प करुया, जलपुनर्भरण चळवळीची गरज

बीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. इतर तलाव कोरडेठाक पडले आहेत. परिणामी सध्या टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या ५७० टॅँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली होती. मागील पाच वर्षांतील आॅक्टोबरमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ४ मीटरने घसरण झाल्याचे निदर्शनास आले होते. तर जानेवारीत केलेल्या तपासणीनंतर आॅक्टोबरमधील पाणीपातळी आणखी खोलवर गेल्याचे समोर आले. ही पाणीपातळी एकूण ७ फूट खोलपर्यंत गेली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मार्चचे दहा दिवस तसेच एप्रिल व मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे.अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्वाचे आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६६ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच ११ तालुके सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.पाच महिन्यांत तीन मीटर खोली वाढली : पुढचे दोन महिने संकटाचेआॅक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ४ मीटरने खालावली होती. त्यानंतरच्या पाच महिन्यात आणखी तीन मीटरने भूजल पातळीत घट झाली. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत, तर सोशल मीडियावरूनही थेंब थेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी शपथ अभियान देखील राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई