शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:15 IST

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे.

ठळक मुद्देजल है तो कल है : जलबचतीचा संकल्प करुया, जलपुनर्भरण चळवळीची गरज

बीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. इतर तलाव कोरडेठाक पडले आहेत. परिणामी सध्या टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या ५७० टॅँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली होती. मागील पाच वर्षांतील आॅक्टोबरमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ४ मीटरने घसरण झाल्याचे निदर्शनास आले होते. तर जानेवारीत केलेल्या तपासणीनंतर आॅक्टोबरमधील पाणीपातळी आणखी खोलवर गेल्याचे समोर आले. ही पाणीपातळी एकूण ७ फूट खोलपर्यंत गेली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मार्चचे दहा दिवस तसेच एप्रिल व मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे.अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्वाचे आहे. बीड जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६६ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच ११ तालुके सध्या पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.पाच महिन्यांत तीन मीटर खोली वाढली : पुढचे दोन महिने संकटाचेआॅक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ४ मीटरने खालावली होती. त्यानंतरच्या पाच महिन्यात आणखी तीन मीटरने भूजल पातळीत घट झाली. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत, तर सोशल मीडियावरूनही थेंब थेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी शपथ अभियान देखील राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाई