शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘जायकवाडी’चे पाणी ‘माजलगावा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:55 IST

पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले.

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यासह माजलगाव धरण क्षेत्रात पडलेल्या दुष्काळामुळे धरणातीलपाणी आॅक्टोबरमध्येच मृतसाठ्यातच गेले असताना या धरणातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होवू नये म्हणून पैठणच्या धरणातील सी.आर. ने कोलत्याचीवाडी येथून पैठणच्या उजव्या कालव्यातून २१ डिसेंबर रोजी सोडलेले पाणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजलगाव धरणात सोडण्यात आले. महिनाभर या पाण्याचा विसर्ग एकूण ३४ दलघमी पाणी येणार आसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.माजलगाव धरणक्षेत्रात या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढली नसून, रोज धरणातील पाण्याचा बीड शहरासह माजलगाव शहर आणि ११ गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत आहे. त्यात होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा कमी होत आहे.माजलगाव धरणाची पाणी पातळी एकूण ११.०२ टीएमसी असून २२ डिसेंबरपर्यंत धरणात मृतसाठा होता. त्यामुळे भविष्यात माजलगाव धरणावर अवलंबून असणाºया गावांचा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह परळी येथील औद्योगिक विद्युत प्रकल्पासाठी पाण्याची गरज होती.या बाबत माजी सभापती नितीन नाईकनवरे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री पंकजा मुंडे, माजलगावचे आ. आर. टी. देशमुख यांच्याकडे तसेच तहसील प्रशसनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे पैठण धरणातील पाणी माजलगाव धरणात सोडण्यात आले. २१ डिसेंबर पासून पैठण धरणाच्या कोलत्याचीवाडी येथून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात सोडलेले पाणी धरणापर्यंत येण्यास जवळपास चार दिवस लागले आहेत. २४ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास माजलगाव धरणात ९०० क्युसेसने सोडले आहे.या मुळे धरणातील पाणी पातळीत निश्चित वाढ होऊन भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने माजलगाव तालुक्यात समाधान व्यक्त होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी