शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
5
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
7
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
8
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
9
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
10
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
11
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
12
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
13
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
14
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
15
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
16
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
17
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बीड जिल्ह्यात पाणी चालले खोलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:17 IST

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत आहे.

ठळक मुद्देपाणी जपून वापरा : माजलगाव तालुक्यात मोठी घसरण, जिल्हाभरात महिन्याला दोन मीटरने घट

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ४ मीटरपर्यंत घटली आहे. धरण व गोदाकाठचा पट्टा असूनही माजलगाव तालुक्यात पाणी पातळी तब्बल साडेसहा मीटरने घसरली आहे. परिस्थिती पाहता जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील सर्वजनिक जलस्त्रोतांची पाणी पातळी दर तीन महिन्याला मोजली जाते. बीड जिल्ह्यात पाणी पातळी मोजण्यासाठी १२६ जलस्त्रोत निश्चित करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला सार्वजनिक स्त्रोतांची पाणी पातळी मोजण्यात येत होती. नंतर मात्र विविध कारणांमुळे जेथे सार्वजनिक स्त्रोत तपासणी शक्य नाही तेथे त्या परिसरातील खाजगी जलस्त्रोतांची पाणी पातळी मोजली जाते.जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ६६६.६६ मिमी. इतकी आहे. यावर्षी पावसाळी हंगामात ३३४.३६ केवळ ५० टक्के इतका पाऊस झाला आहे. झालेला पाऊस सर्वत्र सारखा नसल्याने खरीप व रबी दोन्ही हंगाम धोक्यात आले आहेत. यावर्षी आॅक्टोबरच्या मध्यापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. केवळ सहा प्रकल्पांमध्ये ५५ ते ६५ टक्के पाणीसाठा आहे. ६८ प्रकल्पाती पाणी पातळी जोत्याखाली असून ५५ प्रकल्प कोरडेठाक आहे. उर्वरित १६ प्रकल्पांमध्येही पाणीसाठा समाधानकारक नसल्याची स्थिती आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने तांत्रिक कामे करणाऱ्या कर्मचाºयांकरवी जलस्त्रोतांची मोजली जाते. आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजणी करण्यात आली. पाणी पातळी मोजण्यासाठी निश्चित केलेले काही जलस्त्रोत जुने व पडझड झालेले आहेत. त्यामुळे शेजारच्या विहिरीतील पाणीपातळी मोजण्यात आली. मोजलेली पातळी कमालीची खोलवर जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात जवळपास साडेसहा मीटरने पाणीपातळी घसरली असून पाण्यासाठी समृद्ध असणाºया या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे.१२६ विहिरी : दर तीन महिन्याला मोजमापबीड तालुक्यात १७, अंबाजोगाईत १२, आष्टीत २३, धारुर ३, गेवराई १७, केज ३, माजलगाव १६, परळी १०, पाटोदा ९, शिरुर १०, वडवणी तालुक्यातील ६ अशा १२६ विहिरींची पाणी पातळी दर तीन महिन्याला मोजली जाते.बीड तालुक्यात १ मीटर, अंबाजोगाईत २.७५ मीटर, आष्टीत १. २५ मीटर, धारुर ४ मीटर, गेवराई ४.७५ मीटर, केज अडीच मीटर, माजलगाव ६.४६ मीटर, परळी १ मीटर, पाटोदा २.२१, शिरुर ३.८९, वडवणी तालुक्यात १.३९ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबरमधील उन्हाची तीव्रता पाहता पाणी पातळीत आरखी घट होत आहेत.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई