शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पाणी चालले खोलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:17 IST

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत आहे.

ठळक मुद्देपाणी जपून वापरा : माजलगाव तालुक्यात मोठी घसरण, जिल्हाभरात महिन्याला दोन मीटरने घट

अनिल भंडारी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे पाणी पातळीत कमालीची घट होत आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ४ मीटरपर्यंत घटली आहे. धरण व गोदाकाठचा पट्टा असूनही माजलगाव तालुक्यात पाणी पातळी तब्बल साडेसहा मीटरने घसरली आहे. परिस्थिती पाहता जिल्ह्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील सर्वजनिक जलस्त्रोतांची पाणी पातळी दर तीन महिन्याला मोजली जाते. बीड जिल्ह्यात पाणी पातळी मोजण्यासाठी १२६ जलस्त्रोत निश्चित करण्यात आलेले आहेत. सुरुवातीला सार्वजनिक स्त्रोतांची पाणी पातळी मोजण्यात येत होती. नंतर मात्र विविध कारणांमुळे जेथे सार्वजनिक स्त्रोत तपासणी शक्य नाही तेथे त्या परिसरातील खाजगी जलस्त्रोतांची पाणी पातळी मोजली जाते.जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ६६६.६६ मिमी. इतकी आहे. यावर्षी पावसाळी हंगामात ३३४.३६ केवळ ५० टक्के इतका पाऊस झाला आहे. झालेला पाऊस सर्वत्र सारखा नसल्याने खरीप व रबी दोन्ही हंगाम धोक्यात आले आहेत. यावर्षी आॅक्टोबरच्या मध्यापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील एकूण १४४ प्रकल्पांपैकी दोन मोठ्या प्रकल्पात मृतसाठा आहे. केवळ सहा प्रकल्पांमध्ये ५५ ते ६५ टक्के पाणीसाठा आहे. ६८ प्रकल्पाती पाणी पातळी जोत्याखाली असून ५५ प्रकल्प कोरडेठाक आहे. उर्वरित १६ प्रकल्पांमध्येही पाणीसाठा समाधानकारक नसल्याची स्थिती आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने तांत्रिक कामे करणाऱ्या कर्मचाºयांकरवी जलस्त्रोतांची मोजली जाते. आॅक्टोबरअखेर पावसाळा संपल्यानंतर जलस्त्रोत असलेल्या १२६ विहिरींची पाणीपातळी मोजणी करण्यात आली. पाणी पातळी मोजण्यासाठी निश्चित केलेले काही जलस्त्रोत जुने व पडझड झालेले आहेत. त्यामुळे शेजारच्या विहिरीतील पाणीपातळी मोजण्यात आली. मोजलेली पातळी कमालीची खोलवर जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात जवळपास साडेसहा मीटरने पाणीपातळी घसरली असून पाण्यासाठी समृद्ध असणाºया या तालुक्यात चिंताजनक स्थिती आहे.१२६ विहिरी : दर तीन महिन्याला मोजमापबीड तालुक्यात १७, अंबाजोगाईत १२, आष्टीत २३, धारुर ३, गेवराई १७, केज ३, माजलगाव १६, परळी १०, पाटोदा ९, शिरुर १०, वडवणी तालुक्यातील ६ अशा १२६ विहिरींची पाणी पातळी दर तीन महिन्याला मोजली जाते.बीड तालुक्यात १ मीटर, अंबाजोगाईत २.७५ मीटर, आष्टीत १. २५ मीटर, धारुर ४ मीटर, गेवराई ४.७५ मीटर, केज अडीच मीटर, माजलगाव ६.४६ मीटर, परळी १ मीटर, पाटोदा २.२१, शिरुर ३.८९, वडवणी तालुक्यात १.३९ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबरमधील उन्हाची तीव्रता पाहता पाणी पातळीत आरखी घट होत आहेत.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई