शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

बीड जिल्ह्यात टोलवाटोलवीत रखडली जलयुक्त शिवार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:26 AM

बीड : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी २७ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १६ गावांची कामे पंचायत समितीच्या नरेगा विभागामार्फत करण्यात येणार होती. मात्र, पंचायत समितीच्या वतीने थोड्या प्रमाणात कामे करुन ती बंद क रण्यात आली आहेत, त्या गावातील कामे करण्याची तयारी कृषी विभागाने दर्शवली आहे, मात्र पंचायत ...

बीड : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत मागील वर्षी २७ गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यापैकी १६ गावांची कामे पंचायत समितीच्या नरेगा विभागामार्फत करण्यात येणार होती. मात्र, पंचायत समितीच्या वतीने थोड्या प्रमाणात कामे करुन ती बंद क रण्यात आली आहेत, त्या गावातील कामे करण्याची तयारी कृषी विभागाने दर्शवली आहे, मात्र पंचायत समितीकडून कृषी विभागाला देण्यात आलेल्या पत्रामध्ये त्रुटी असल्यमुळे अपूर्ण कामे पुन्हा सुरु करता येत नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे,जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थीती निवारणासाठी जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. ही योजना कृषी विभाग व पंचायतसमिती स्तारावर नरेगाच्या माध्यमातून राबवली जात होती. मात्र पंचायत समितीच्या नरेगाअंतर्गत मंजूर असलेल्या १६ गावांमध्ये काही प्रमाणात कामे करुन ती बंद केली आहेत्. ही बंद असलेली जलयुक्त शिवारची कामे पुन्हा सुरु करण्याची मागणी संबंधीत गावातील नागरिकांनी केली आहे.

जलयुक्त शिवार योजनेतील अपूर्ण कामे करण्याची तयारी कृषी विभागच्या वतीने दर्शवण्यात आली आहे. मात्र ज्या गावांमध्ये नरेगाअंतर्गत कामे झाली आहेत. ती कोणत्या गट नंबर मध्ये व किती प्रमाणात झाले याची माहिती व कामे करण्यासंदर्भात पत्र देण्याची मागणी कृषी विभागाने केली होती. पंचायत समितीकडून १६ गावांच्या संदर्भात कृषी विभागाला पत्र दिले आहे. परंतू यामध्ये कामे अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळेही कामे नेमकी कुठे झाली याविषयी संभ्रम आहे त्यामुळे कामे सरु करण्यास विलंब होत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.पं.स. नरेगांतर्गत कामे झालीच नाहीत ?अनेक गावांमध्ये पं.स. नरेगाअंतर्गत जलयुक्त शिवारची कामे न करताच पैसे उचलल्याची सूत्रांची माहिती आहे. २०१४ ते १७ या वर्षातील कामे आहेत, यामधील काही कमे अपूर्ण तर काही पूर्ण झाल्याचे नरेगाच्या संकेतस्थळावर दिसत आहे. त्यामुळे संबंधीत गावातील नागरिकांनी या कामांची चौकशी करुन संबंधीतांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी केली आहे.

समन्वयाचा अभाव; नागरिकांमध्ये संतापनरेगाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची माहिती, तसेच कोणत्या गट नंबर मध्ये जलयुक्तची किती कामे केली आहेत, याविषयी पत्राद्वारे माहिती देऊन एक महिना झाला आहे, अशी माहिती बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुरुकमारे यांनी दिली. परंतू या दोन्ही विभागातील समन्वयाच्या अभावामुळे १६ गावांमधील जलयुक्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडJalyukt Shivarजलयुक्त शिवारMarathwadaमराठवाडा