शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

१७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:50 IST

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या ...

ठळक मुद्देआंदोलकांचा रुद्रावतार पाहून प्रशासन ताळ्यावर : पाणीपुरवठा विभागाला दिले आदेश

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. मागील काही दिवसात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक भागात अवेळी पाणीपुरवठा होत आहे.शहरातील जुने आरटीओ कार्यालयाच्या मागील स्वराज्य नगर भागात १९ मे रोजी नगर पालिकेचा पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर ६ जूनपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी या भागातील नागरिकांना परिसरात इतरत्र भटकंती करावी लागत आहे.स्वराज्य नगर भागाला पाणी पुरवठा ज्या टाकीवरुन केला जाते, त्या टाकीवरुन टॅँकर भरून दिले जात आहेत, मात्र या भागाकडे पाणी पुरवठा करण्याकडे साफ दुर्ल झाले आहे. आज, उद्या पाणी येई या प्रतीक्षेत १७ दिवस होऊनही पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी थेट पालिका कार्यालय गाठले. मुख्याधिकाºयांच्या दालनात तासभर ठिय्या मांडत सुरळीत व आठ दिवसाआड नियमित पाणी पुरवठ्याची मागणी लावून धरली. वेळीच पाणी पुरवठा न झाल्यास येडशी - औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.सदरील आंदोलनामध्ये आशा घोडके, मंगल बिडवे, सी. एन. चाळक, राणी कल्याणकर, प्रयागबाई खामकर, र्वो शिंदे, स्वाती काळे, कल्पना सुरवसे, रेखा धांडे, वैशाली काळे, नंदिनी तागड, उर्मिलाराऊत, श्रीनंदा घोडके, वर्षा जोगदंड, संगीता खाडे, त्रिवेणी मानकर, इंदुमती सोळंके, वंदना मुळे, आशा देवकर, राधा रोडगे, अनिता काळे, अनिता विरेकर, जिजाबाई सातपुते, रेखा उबाळे, अरुणा पवार, अंजली सोनवळकर यांच्यासह स्वराज्य नगरमधील महिला, पुरषांनी भाग घेतला.दरम्यान आंदोलकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत स्वराज्य नगर भागाला तत्काळ पाणी पुरवठा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी अधिकाºयांनी पाणी पुरवठा विभागाला दिले. स्वराज्य नगरप्रमाणे शहरातील इतर भागातही पाणी टंचाईचा प्रश्न वारंवार जाणवत आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईWomenमहिलाagitationआंदोलन