शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

गुडघाभर पाण्यातून रोज अडीच किमी पायपीट, कधी साप आढळतात, कधी रानडुकरे धावतात, पिंपळवाडीत विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

By संजय तिपाले | Updated: September 18, 2022 14:34 IST

beed News: अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात.

बीड - अवघड वळणाची, नद्या, ओढ्यांची वाट... पावसाळ्यात गुडघाभर पाणी, चिखल अन् रस्त्याला आलेले डबक्याचे स्वरुप... कधीसाप दिसतात तर रानडुकरे आडवी येतात. मात्र, शाळेच्या ओढीने पाऊणशे विद्यार्थी ही कसरत रोजच करतात. तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील वस्त्यांवरील हे चित्र ग्रामीण विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट अद्यापही कशी बिकट आहे, हेच दर्शवते.

पिंपळवाडी हे डोंगरदऱ्रूात वसलेले गाव. शेतीकामे सुलभ व्हावीत म्हणून काही कुटुंबे शेतात स्थलांतरित झाली अन् पाहता- पाहता वेगवेगळ्या वस्त्या तयार झाल्या. बहिरवाल, खटाणे, चादर, सटवाई व तुपे या नावांनी ओळखल्या जाणाऱ्रूा वस्त्यांवर कुटुंबांची संख्या वाढत गेली. मात्र, या वस्त्या मूलभूत सोयींपासून दूरच राहिल्या. दळणवळणासाठी ना धड रस्ता आहे ना वाहनांची सुविधा. पावसाळ्यात वाहने उभी करुन पायी ये- जा केल्याखेरीज पर्याय नसतो. याचा फटका वृध्द, महिला, रुग्णांना तर बसतोच,पण विद्यार्थ्यांना रोजच कसरत करावी लागते. लोकवर्गणीतून २५ हजार रुपये गोळा करुन ग्रामस्थांनी तात्पुरती डागडुजी केली आहे. जेसीबीद्वारे पाणी एका बाजूने काढून देत मुरुम टाकला, पण हक्काच्या रस्त्याची वस्तीवरील लोकांना प्रतीक्षाच आहे.

....एक नदी अन् तीन ओढे

या पाच वस्त्यांपासून गावाचे अंतर अडीच किलोमीटर आहे. पाणंद रस्त्यातून ये- जा करावी लागते. वाटेत बिंदुसरा नदी व तीन ओढे लागतात. पावसाळ्यात त्यास पाणी आल्यावर दोन्ही काठांवर ताटकळ बसावे लागते.....

स्वतंत्र शाळा सुरु करावी

पहिली ते दहावीपर्यंतची जवळपास ७५ मुले या वस्त्यांवरुन गावात शिक्षणासाठी ये- जा करतात. पाठवी दफ्तराचे ओझे घेऊन मुलांना चिखल तुडवत पाण्यातून वाट काढावी लागते. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने वस्तीवर जिल्हा परिषदेने स्वतंत्र शाळा सुरु करावी, अशी मागणी माजी सरपंच युवराज बहिरवाळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री संदीपान भुमरे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना भेटून कैफियत मांडली आहे. प्रशासनाने यासाठी तातडीने पाऊले उचलावीत,असे ते म्हणाले.....

विद्यार्थी म्हणतात...शाळेत जाण्यासाठी घरातून दोन तास आधीच निघावे लागते, घरी पोहोचायलाही तेवढाच वेळ लागतो. शुज, चप्पल घालता येत नाही. त्यामुळे रोजच त्रास सहन करावा लागतो.

- पूजा बहिरवाळ, विद्यार्थिनी...

पाण्यातून जपून पाऊले टाकावी लागतात. दगड, काटे टोचतात. कधी सापाची भीती असते, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ऊसाची शेती असल्याने रानडुकरांची दहशत असते.

- अंकिता बहिरवाळ, विद्यार्थिनी

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीBeedबीड