शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त; हलगी मोर्चा काढून महावितरण कार्यालयास घातला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 17:10 IST

लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी देत आंदोलनास स्थगिती दिली.

दिंद्रुड ( बीड): गेल्या काही दिवसांपासून दिंद्रुड येथे विजेचा लपंडाव नियमित झाला आहे. यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी आज सकाळी येथील हलगी मोर्चा काढत महावितरण कार्यालयाला घेराव घातला. आक्रमक ग्रामस्थांनी यावेळी महावितरण अभियंत्यास बेशरमाच्या पानांचा हार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव म्हणून दिंद्रुडची नोंद आहे. मागील आठ दिवसांपासून गावात विजेचा सतत लपंडाव होत आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेले असून त्यात वीज नसल्याने गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळोवेळी मागणीकरूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने आज सकाळी दिंद्रुड ग्रामस्थांनी हलगी मोर्चा काढत महावितरण कार्यालयाला घेराव घातला. अभियंता उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यास संपूर्ण वीज पुरवठा बंद पाडण्यास भाग पाडले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत वीज पुरवठा सुरू न करण्याचा पवित्रा दिंद्रुडकरांनी घेतला.

दरम्यान, तब्बल दोन तासानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता योगेश बोरखडे यांनी कार्यालयात येत ग्रामस्थांची बाजू समजून घेतली. यावेळी ग्रामस्थांनी सहाय्यक कनिष्ठ अभियंत्यास बेशरमीच्या पानांचा हार घालत निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी देत आंदोलनास स्थगिती दिली.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन