शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तारू गव्हाण बंधाऱ्यासाठी ग्रामस्थांचे गोदापात्रात आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:51 IST

गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

माजलगाव (बीड ) : तारू गव्हाण येथील गोदावरी नदी वरील बंधाऱ्याचे काम मागील तेरा वर्षापासून प्रलंबित असून अत्यंत धीम्या गतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधाऱ्यावरील अवलंबून असणाऱ्या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी गोदापात्रात लाक्षणिक धरणे आंदोलन केले. 

माजलगाव ,परळी, पाथरी तालुक्यातील पंचेवीस गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयाच्या बंधाऱ्याचे बांधकाम तेरा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. या बंधाऱ्यातील पाण्याच्या  उपलब्धतेमुळे पाथरी सह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. त्या दृष्टीने या बंधाऱ्याची बांधणी करण्याचे आयोजन होते. परंतु जवळपास १३ वर्षापासून ा बंधार्‍याची बांधणी सुरू करण्यात आली. परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास पंचवीस गावातील शेतकरी वर्ग चातकाप्रमाणे बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत. 

यामुळे गावकऱ्यांनी बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गोदावरी पात्रातच आज दुपारी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांनी बंधा-याचे गेट १५ जुलैपर्यंत बसविण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात ग्रामस्थ आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख ,अनंतराव डक, बाळासाहेब डाके,अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे,अमित नाटकर  आदींची उपस्थिती होती.  

टॅग्स :agitationआंदोलनWaterपाणीgodavariगोदावरी