शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:16 AM

पिकांवर कीड बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रब्बी पिके बहरू लागली आहेत, परंतु या पिकांना थंडी आवश्यक असताना ...

पिकांवर कीड

बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या रब्बी पिके बहरू लागली आहेत, परंतु या पिकांना थंडी आवश्यक असताना थंडी ओसरली असल्याने परिणामी पिकांवर कीड दिसत आहे.

रस्त्यांवर खड्डे वाढले

धारूर : धारूर ते आसरडोह या १४ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणारे वाहनधारक वैतागले आहेत. या रस्त्याचे अंतर कापण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे लागत आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

भाजीचे भाव घसरले

अंबाजोगाई : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने भाजी दरांमध्ये घसरण झाली आहे. टोमॅटो, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, पालेभाज्या, फळभाज्यांचे दर कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

वीज दिवसा द्या

शिरूर कासार : रब्बी हंगामातील पिकांना पूर्ण दाबाने दिवसाच वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बिबट्याची भीती अजून गेलेली नाही. महावितरणने दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने ग्राहक त्रस्त

अंबाजोगाई : खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. तसेच किराणा सामानातील वस्तूंचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांना महागाईची मोठ झळ सहन करावी लागत आहे. अचानकच सोयाबीन तेलाचे भाव किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी

अंबाजोगाई : तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा भरला होता. यावर्षी मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या. या सर्व घटनांचे पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. तरीही अद्याप शासनाकडून पीकविम्याचे वाटप करण्यात आलेले नाही. शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान समोर ठेवून खरीप हंगामातील पीक विमा लागू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.