शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

वंचित बहुजन आघाडीला खिंडार; उसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर मनसेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2022 22:32 IST

आपला कोणावरही वैयक्तिक राग नसून समर्थक, सहकाऱ्यांच्या भावनेचा आदर ठेऊन मनसेत जाण्याचा निर्णय घेतला असं प्रा. बांगर यांनी म्हटलं.

सोमनाथ खताळ

बीड : वंचित बहुजन आघाडीतील ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात हा कार्यक्रम पार पडला. सर्वसामान्यांसह ऊसतोड कामागर प्रश्नी आवाज उठवत राहू, अशी ग्वाही प्रा.बांगर यांनी दिली.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे, बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर आदी उपस्थित होते. प्रा.शिवराज बांगर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीमध्ये जीवाचे रान करून कार्य केले. परंतु, मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले, तेव्हा माझ्यावरील गुन्हा व एमपीडीएची कारवाई ही वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे सांगत पक्षाकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे आपला कोणावरही वैयक्तिक राग नसून समर्थक, सहकाऱ्यांच्या भावनेचा आदर ठेऊन मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत चळवळीत काम केले असून ऊसतोड कामगारांसह गोरगरीबांच्या प्रश्नावर आवाज उठवत आलो आहे. येत्या काळात मनसेत संघर्ष करू, ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही बांगर म्हणाले.

वंचितकडूनही बांगर यांना प्रत्युत्तर 

वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदचे आंदोलन पुकारले असता फेसबुकवरून पोलिसांविरुध्द आक्षेपार्ह व अर्वाच्य भाषेत लिहिल्यामुळे पोलिसांनी आपणांस ताब्यात घेतले होते तेव्हा पक्षश्रेष्ठींनी रात्रीतून आपल्याला बाहेर काढले. आपला पिंड संघटन वाढवण्याचा नाही तेव्हा आपण एखादा मतदार संघ घेऊन निवडणुकीची तयारी करा असा सल्ला आपल्याला वेळोवेळी दिला. तो मानला असता तर काही ठोस काम झाले असते. परंतू आमचा सल्ला आपण मानला नाही व आपण मागितलेल्या जबाबदाऱ्या आपल्याला दिल्या. आपण त्या पार पाडू शकला नाही. कार्यकर्त्यांना पक्षाबाहेर काढण्याची पक्षाची भूमिका नाही. पक्ष फक्त पदामध्ये बदल करत असतो. जबाबदार्‍या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना देत असतो. पक्ष आपल्यापाठी वारंवार उभा राहिल्या नंतरही आपणच सोशल मीडियावर पक्षाविरुद्ध लिहले आहे व राजीनामा दिला आहे तो प्रत्यक्षात पक्ष कार्यालयाला मिळालेला नाही परंतू तरीही तो आम्ही स्वीकारला आहे असं सांगत वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

टॅग्स :MNSमनसेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी