शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

दोन महिन्यांत १० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 23:46 IST

भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

ठळक मुद्देअंबाजोगाई-लातूर नवीन रस्त्याच्या उद्घाटनापूर्वीच अपघातांची मालिका

अंबाजोगाई: भरधाव येणारी वाहने, त्यातच दुपदरी रस्ता, दुभाजकाचा अभाव, यामुळे रस्ता पुढे निमुळता झाल्याने वाहतुकीची होणारी कोंडी यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. गेल्या दोन महिन्यात दहा जणांचे बळी गेले, तर अनेक जण जखमी झाले. अंबाजोगाई - लातूर नवीन रस्त्याच्या उद्घाटनापूर्वीच अपघातांची मालिका सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.अंबाजोगाई ते लातूर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. केंद्र शासनाने भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने बीड जिल्ह्यात ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून रस्त्याची कामे सुरू केली. औरंगाबाद ते लातूर या रस्त्याची मोठी रहदारी याच रस्त्यावर दिसून येते.सदरील रस्त्याचे काम सुरू आहे. रेणापूर ते बर्दापूर या अंतरावर हा रस्ता चौपदरी झाला. मात्र, बर्दापूरपासून पुढे अंबाजोगाई साखर कारखान्यापर्यंत हा रस्ता पुढे दोन पदरीच ठेवण्यात आला. मोठा झालेला रस्ता अचानकच निमूळता व लहान झाला. त्यात या रस्त्यावर दुभाजकही बसविले नाहीत.चार पदरी रस्त्याची वाहतूक दोन पदरी रस्त्यावर येऊन ठेपली. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर रस्ता लहान झाल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढली.शनिवारी रात्री झालेल्या तिहेरी अपघतात तिघांचा मृत्यू झाला. या रस्त्याने येणाऱ्या प्राध्यापकाला वाहनाने चिरडले. रस्ता ओलांडणा-या महिलेचा मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी लग्नाचे वºहाड घेऊन येणारा टेम्पो मातीचा ढिगारा चुकवतांना समोरच्या वाहनावर धडकला.या अपघातात दोघे ठार तर १० जण गंभीर जखमी झाले होते. उभ्या वाहनांवर जीप आदळल्याने सेलू येथील दोघे गंभीर जखमी झाले होते. तर शनिवारी रात्री याच रस्त्यावर झालेल्या अपघातात तीन जणांचे बळी गेले. चार जखमींवर उपचार सुरु आहेत. गेल्या महिनाभरात लहान-मोठ्या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.नवीन झालेला हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच धोकादायक ठरू लागला आहे. वाहनचालकांत या रस्त्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.चौपदरीकरण करा, अन्यथा आंदोलन...!बर्दापूर फाटा ते अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करावे ही मागणी सातत्याने प्रशासकीय पातळीवर मांडण्यात आली.याबाबतचा पाठपुरावा रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडेही करण्यात आला. तरीही शासन या संदर्भात गांभीर्याने विचार करत नाही.रस्ता लहान झाल्याने अपघाताचे सत्र सुरू आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी चौपदरीकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिला आहे.या रस्त्यावर वाढलेली वाहतूक लक्षात घेता रुंदीकरणासाठी तत्काळ निर्णय अपेक्षित आहे.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातagitationआंदोलन