शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दोनशे हेक्टरवरील डाळिंबाच्या बागा वाळल्या; केळी, आंब्याच्या बागांत तीच परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 04:36 IST

आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली.

- दीपक नाईकवाडेकेज (जि. बीड) : बारा वर्षांपूर्वी लागवड करून जोपासलेल्या डाळिंबाच्या दोनशे हेक्टर क्षेत्रातील बागा यावर्षीच्या दुष्काळाने वाळून गेल्याने उंदरी (ता. केज) येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. केळी व आंब्याच्या बागांची अशीच परिस्थिती झाली आहे.उंदरी येथे २००८ पासून येथील शंभरावर शेतकऱ्यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करण्यास सुरुवात केली. डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनासाठी उंदरचे नाव महाराष्ट्रात झाले. त्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी प्रोत्साहन दिले.दुष्काळाने विहिरीसह बोअरवेल व शेततळ्यातील पाणी आटल्याने शेजारच्या शेतकºयांकडून एक हजार रुपये तासाने पाणी घेतले. मात्र पाणी कमी पडल्याने केळीची बाग ऐन भरात वाळून गेली, असे उत्तम ठोंबरे यांनी सांगितले.आईच्या नावे असलेल्या साडेनऊ एकरपैकी एक एकर क्षेत्रात डाळिंबाची पाच वर्षापूर्वी लागवड केली. एक एकरात आंबा व शेवगा लावला. डाळिंबास कळी लागून माल धरण्यास सुरुवात होताच पाणी कमी पडल्याने डाळिंबासह आंबा व शेवगा वाळून गेला, अशी व्यथा मधुकर ठोंबरे यांनी मांडली.दोन एकर बाग टँकरवरदहा एकरात २००८ मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. २००८ मध्ये शेततळे घेतले. चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. दुष्काळाने १० एकरची डाळिंबाची बाग दोन एकरवर आल्याने पंचवीस लाख रूपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. दोन एकर बाग टँकरने पाणी आणून जगवत आहे.- भागवत ठोंबरे, शेतकरीतीन लाखांचा फटकासाडेचार एकर क्षेत्रापैकी दोन एकरमध्ये गेल्या दहा वर्षांपूर्वी डाळिंबाची लागवड केली होती. दरवर्षी पंधरा टन उत्पादन निघत होते. यावर्षी बाग धरण्यासाठी ७० हजार रुपयांचा खर्च केला. बाग हातची गेल्याने तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच भावाच्या शेतातील एक हेक्टर क्षेत्रातील गावरान आंब्याची बाग वाळून गेली.- नानासाहेब मोहन जाधव, शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळ