शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

बाजारपेठेतील जागेच्या वादातून परळीत दोन गटात राडा; ३० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 13:23 IST

दुकानात घुसून गोंधळ, चौकात वाहनांवर हल्ला

परळी :शहरातील मोंढा विभागात मकर संक्रातीसाठी सुगडे विकण्यास बसलेल्या उद्धव कुंभार यास जागेच्या कारणावरून मोंढयातील फळ विक्रेत्यांच्या गटाने  रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास  जबर मारहाण केली.मध्यस्थी करण्यास गेलेल्यांना देखील मारहाण झाल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणी 30 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळास  रात्री बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,आंबेजोगाई च्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिडके मॅडम अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले  यांनी भेटी दिल्या आहेत.                       .                     

मकरसक्रांतीनिमित्त येथील राणी लक्ष्मीबाई टावर  ते मोंढा मार्केट दरम्यान रस्त्यावर फळ विक्रेते व इतर वाण विक्रीचे गाडे लावण्यात आले आहेत. उद्धव कुंभार हा रविवारी दुपारी मोंढा भागात सुगडे विकण्यासाठी बसला.तेथे बसण्यास फळ विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे उद्धव  हा भांड्याचे व्यापारी शाम वानरे यांच्या दुकानाजवळ येवून बसला. दरम्यान, रविवारी रात्री 8.30 वाजता फळ विक्रेत्यांच्या एका गटाने कुंभार यांना मारहाण केली. यावेळी वानरे यांच्या भांड्याच्या दुकानातही गोंधळ घातला . त्यामुळे वातावरण तणावाचे झाले.

याप्रकरणी परळी शहर  पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 30  लोकांविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धिंगाणा घालणाऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती परळी शहर चे  सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी दिली. 

दोन गटाचा तूफान राडा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात महिलांची गर्दी असतानाच अचानक काही  लोकांनी दुकानात घुसून एकास जबर मारहाण केली. यावेळी सोडवासोडवी करण्यास गेलेल्यासही या जबर मारहाण केली. याबाबत काहींनी पोलीसात तक्रार करण्यास गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही. यामुळे बराच गोंधळ झाला. दरम्यान याचवेळी  एक गट हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना दुसर्‍या गटाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. याचवेळी नेहरू चौक भागातील वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यांचे प्रयत्न कमी पडू लागले.

पोलिसांनी शहरात वाहने फिरवून शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून प्रकरणावर नियंत्रण ठेवले.रविवारी  रात्री  यांनी  उद्धव कुंभार  यांनी परळी शहर  पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून 15 जणा वीरोधात तर पोलिसांच्या फिर्यादी वरून 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता शहरात शांतता आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी