शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील जागेच्या वादातून परळीत दोन गटात राडा; ३० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 13:23 IST

दुकानात घुसून गोंधळ, चौकात वाहनांवर हल्ला

परळी :शहरातील मोंढा विभागात मकर संक्रातीसाठी सुगडे विकण्यास बसलेल्या उद्धव कुंभार यास जागेच्या कारणावरून मोंढयातील फळ विक्रेत्यांच्या गटाने  रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास  जबर मारहाण केली.मध्यस्थी करण्यास गेलेल्यांना देखील मारहाण झाल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणी 30 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळास  रात्री बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,आंबेजोगाई च्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिडके मॅडम अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले  यांनी भेटी दिल्या आहेत.                       .                     

मकरसक्रांतीनिमित्त येथील राणी लक्ष्मीबाई टावर  ते मोंढा मार्केट दरम्यान रस्त्यावर फळ विक्रेते व इतर वाण विक्रीचे गाडे लावण्यात आले आहेत. उद्धव कुंभार हा रविवारी दुपारी मोंढा भागात सुगडे विकण्यासाठी बसला.तेथे बसण्यास फळ विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे उद्धव  हा भांड्याचे व्यापारी शाम वानरे यांच्या दुकानाजवळ येवून बसला. दरम्यान, रविवारी रात्री 8.30 वाजता फळ विक्रेत्यांच्या एका गटाने कुंभार यांना मारहाण केली. यावेळी वानरे यांच्या भांड्याच्या दुकानातही गोंधळ घातला . त्यामुळे वातावरण तणावाचे झाले.

याप्रकरणी परळी शहर  पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 30  लोकांविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. धिंगाणा घालणाऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती परळी शहर चे  सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी दिली. 

दोन गटाचा तूफान राडा मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात महिलांची गर्दी असतानाच अचानक काही  लोकांनी दुकानात घुसून एकास जबर मारहाण केली. यावेळी सोडवासोडवी करण्यास गेलेल्यासही या जबर मारहाण केली. याबाबत काहींनी पोलीसात तक्रार करण्यास गेले असता त्यांची तक्रार घेतली नाही. यामुळे बराच गोंधळ झाला. दरम्यान याचवेळी  एक गट हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना दुसर्‍या गटाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक झाली. याचवेळी नेहरू चौक भागातील वाहनांचीही मोडतोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यांचे प्रयत्न कमी पडू लागले.

पोलिसांनी शहरात वाहने फिरवून शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून प्रकरणावर नियंत्रण ठेवले.रविवारी  रात्री  यांनी  उद्धव कुंभार  यांनी परळी शहर  पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून 15 जणा वीरोधात तर पोलिसांच्या फिर्यादी वरून 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता शहरात शांतता आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी