शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:42 IST

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील सात वर्षात तब्बल १३०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जनजागृती, योजनांचा लाभ दिला जात असतानाही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आत्महत्या रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी तर पावसाळा संपत आला तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. रिमझीम पावसावरच पेरण्या झाल्या. थोड्याफार झालेल्या पावसावर पिके कसे बसे जगविले.खत, फवारणी हजारो रूपये खर्च केले. मात्र, एवढे असतानाही दुष्काळी परिस्थितीमुळे अद्यापही पीके जोमात आलेले नाहीत. त्यामुळे केलेला खर्च निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातूनच ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे.२०१३ ते १३ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यात १३०३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ३०१ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या आहेत. २००४ ते २०१८ पर्यंत १८१५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. पैकी १२०६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत तर ६०९ प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आलेलीआहेत.४०३२ शेतकरी तणावग्रस्तजिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून शेतकरी तणावाखाली आहेत का, याची माहिती घेतली जाते. मागील सहा महिन्यात ३ लाख ४६ हजार ७२७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ४ हजार ३२ शेतकरी तणाग्रस्त आढळले आहेत.त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून समुपदेशन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले, डॉ.मुजाहेद, परिचारिका विजया शेळके, अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे, शीतल टाक, महेश कदम, तांदळे हे यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSocialसामाजिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्जdroughtदुष्काळ