शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:42 IST

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील सात वर्षात तब्बल १३०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जनजागृती, योजनांचा लाभ दिला जात असतानाही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आत्महत्या रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी तर पावसाळा संपत आला तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. रिमझीम पावसावरच पेरण्या झाल्या. थोड्याफार झालेल्या पावसावर पिके कसे बसे जगविले.खत, फवारणी हजारो रूपये खर्च केले. मात्र, एवढे असतानाही दुष्काळी परिस्थितीमुळे अद्यापही पीके जोमात आलेले नाहीत. त्यामुळे केलेला खर्च निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातूनच ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे.२०१३ ते १३ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यात १३०३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ३०१ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या आहेत. २००४ ते २०१८ पर्यंत १८१५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. पैकी १२०६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत तर ६०९ प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आलेलीआहेत.४०३२ शेतकरी तणावग्रस्तजिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून शेतकरी तणावाखाली आहेत का, याची माहिती घेतली जाते. मागील सहा महिन्यात ३ लाख ४६ हजार ७२७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ४ हजार ३२ शेतकरी तणाग्रस्त आढळले आहेत.त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून समुपदेशन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले, डॉ.मुजाहेद, परिचारिका विजया शेळके, अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे, शीतल टाक, महेश कदम, तांदळे हे यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSocialसामाजिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्जdroughtदुष्काळ