शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:42 IST

दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळ, नापिकीसारख्या विविध कारणांमुळे बीड जिल्ह्यात दर दोन दिवसाला एक शेतकरी जीवनयात्रा संपवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील सात वर्षात तब्बल १३०३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. जनजागृती, योजनांचा लाभ दिला जात असतानाही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या आत्महत्या रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्याचे समोर आले आहे.बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी तर पावसाळा संपत आला तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. रिमझीम पावसावरच पेरण्या झाल्या. थोड्याफार झालेल्या पावसावर पिके कसे बसे जगविले.खत, फवारणी हजारो रूपये खर्च केले. मात्र, एवढे असतानाही दुष्काळी परिस्थितीमुळे अद्यापही पीके जोमात आलेले नाहीत. त्यामुळे केलेला खर्च निघेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातूनच ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगण्यात येत आहे.२०१३ ते १३ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यात १३०३ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक ३०१ आत्महत्या २०१५ मध्ये झाल्या आहेत. २००४ ते २०१८ पर्यंत १८१५ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी आहे. पैकी १२०६ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत तर ६०९ प्रकरणे विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आलेलीआहेत.४०३२ शेतकरी तणावग्रस्तजिल्हा रूग्णालयातील प्रकल्प प्रेरणा विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून शेतकरी तणावाखाली आहेत का, याची माहिती घेतली जाते. मागील सहा महिन्यात ३ लाख ४६ हजार ७२७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ४ हजार ३२ शेतकरी तणाग्रस्त आढळले आहेत.त्यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करून समुपदेशन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले, डॉ.मुजाहेद, परिचारिका विजया शेळके, अशोक मते, अंबादास जाधव, प्रियंका भोंडवे, शीतल टाक, महेश कदम, तांदळे हे यासाठी काम करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSocialसामाजिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रCrop Loanपीक कर्जdroughtदुष्काळ