शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Tanaji Sawant: आरोग्य विभागातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना २४ तासांतच स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 20:42 IST

आरोग्य मंत्र्यांचे पत्र : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाचे दिले कारण

सोमनाथ खताळ

बीड : जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेष तज्ज्ञ संवर्गातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी दुपारी शासनाने काढले होते. परंतू याला २४ तासांतच स्थगिती दिली आहे. आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याने या बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे रूजू होण्यासाठी निघालेले काही अधिकारी अर्ध्या रस्त्यातून परतले आहेत. राज्यातील १७ अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना दिली होती. यात जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. यातील काही अधिकाऱ्यांना पदावनत करून पदस्थापना दिली होती. सोमवारी हे अधिकारी रूजू होण्याच्या तयारीत होते. त्यासाठी कोणी शनिवारी दुपारीच निघाले होते तर कोणी रविवारी निघणार होते. परंतू या बदल्यांना २४ तासांच्या आतच आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी स्थगिती दिली आहे. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याचे कारण त्यांनी पत्रात दिले आहे. याबाबत आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, संचालक डॉ.साधना तायडे यांना वारंवार संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.

एका दिवसात काय फरक पडणार?

आरोग्य मंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान नवरात्र उत्सव काळात सुरू झाले होते. परंतू महिलांचा अल्प प्रतिसाद पाहता याला दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतरही कमीच तपासणी झाली. पुन्हा १५ नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ दिली. आता हे अभियान संपण्यास दोन दिवस बाकी असून त्यातही एका रविवारचा समावेश आहे. मग सोमवारी अभियान संपत असतानाही कारण देऊन बदल्यांना स्थगिती देण्यामागचा उद्देश काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बदल्या करण्याची आरोग्य मंत्र्यांना नव्हती का? होती तर अचानक का स्थगिती दिली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, ज्येष्ठता व इतर तांत्रीक अडचणी असल्याने काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळेच याला स्थगिती दिल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे.

आदेश दोन, परंतू क्रमांक सारखाच

शासनाने शुक्रवारी दोन आदेश काढले. दोन्हीचे शासन आदेश क्रमांक सारखेच (शासन आदेश क्रमांक : बदली - २०२२/प्र.क्र.३१४/सेवा२) आहेत. शासनाच्या वेबसाईटवर मात्र सांकेतांक क्रमांक वेगवेगळे आहेत. पत्रात याच आदेश क्रमांकाचा उल्लेख केल्याने दोघांनाही स्थगिती समजली जात आहे. परंतू त्यातच जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग असा स्पष्ट उल्लेख असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकारीही धास्तावले आहेत. शासनाच्या या गोंधळामुळे इकडे अधिकारी, कर्मचारीही गोंधळल्याचे दिसत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यTanaji Sawantतानाजी सावंतBeedबीड