शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आज ४४ हजार विद्यार्थी देणार जिज्ञासा कसोटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:19 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी (३० एप्रिल) रोजी होत असून ४४ हजार ४२९ विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचे अनुमान काढले जाणार आहे.खबरदारी घ्या, उन्हापासून बचाव करासर्व शाळांतील चौथी व सातवी वर्गाच्या शिक्षकांनी मुलांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत आणण्याचे व परत घरी पोहचविण्याचे योग्य ते नियोजन करावे. उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ आदी आवश्यक साहित्य विद्यार्थी व शिक्षकांनी सोबत ठेवणे, परीक्षा केंद्रावर संचालकांनी विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याच्या जारची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था सावलीतच करावी. आवश्यकता असल्यास मंडप उभारावा, विद्यार्थी उन्हामध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, वर्गात पंख्यांची पुरेशी व्यवस्था करावी, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत लेखी कळवावे, कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर एक कक्ष स्थापन करुन प्रत्येक केंद्रावर सूचनेनुसार व्यवस्थेचा आढावा घेण्याचे कळविले आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.कशासाठी परीक्षा ?शिष्यवृत्ती परिक्षेच्या धर्तीवर चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये नियमित शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, व्यवहार ज्ञान, सामान्य ज्ञान व बौध्दिक विकास करणे, तसेच पाठ्यपुस्तकातील शिक्षणा बरोबरच सभोवतालच्या घटना, निसर्ग, पर्यावरण, निरीक्षण, आकलन करुन जिज्ञासा वाढविणे, प्रयोग, प्रात्यक्षिकाद्वारे व्यवहारातील गोष्टी समजून घेणे, यासाठी बीड जिल्हा परिषद ‘विद्यार्थी जिज्ञासा कसोटी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असून, याचे निश्चितच चांगले परिणाम मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.ओएमआर पद्धतीने तपासणीजिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता चौथीचे ३१ हजार ७२७ विद्यार्थी १६४ केंद्रावर, तर इयत्ता सातवीचे १२ हजार ७०२ विद्यार्थी १५९ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.३० एप्रिल रोजी सकाळी ९. ३० ते ११.३० व दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत विद्यार्थी आकलन कसोटी व विद्यार्थी सामान्य, व्यवहार ज्ञान कसोटी असे दोन पेपर आहेत.प्रत्येकी २०० गुणांची परीक्षा असून परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे आहे.प्रश्नपत्रिका सर्व तालुक्यात वितरीत झाल्या असून ओएमआर पध्दतीने उत्तरपत्रिकांची तपासणी होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी