शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

आज ४४ हजार विद्यार्थी देणार जिज्ञासा कसोटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:19 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता चौथी व सातवी मधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘जिज्ञासा कसोटी’ या उपक्रमाची परीक्षा मंगळवारी (३० एप्रिल) रोजी होत असून ४४ हजार ४२९ विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचे अनुमान काढले जाणार आहे.खबरदारी घ्या, उन्हापासून बचाव करासर्व शाळांतील चौथी व सातवी वर्गाच्या शिक्षकांनी मुलांना सुरक्षितपणे परीक्षा केंद्रापर्यंत आणण्याचे व परत घरी पोहचविण्याचे योग्य ते नियोजन करावे. उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्फ आदी आवश्यक साहित्य विद्यार्थी व शिक्षकांनी सोबत ठेवणे, परीक्षा केंद्रावर संचालकांनी विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याच्या जारची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन व्यवस्था सावलीतच करावी. आवश्यकता असल्यास मंडप उभारावा, विद्यार्थी उन्हामध्ये जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, वर्गात पंख्यांची पुरेशी व्यवस्था करावी, जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत लेखी कळवावे, कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर एक कक्ष स्थापन करुन प्रत्येक केंद्रावर सूचनेनुसार व्यवस्थेचा आढावा घेण्याचे कळविले आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.कशासाठी परीक्षा ?शिष्यवृत्ती परिक्षेच्या धर्तीवर चौथी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये नियमित शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, व्यवहार ज्ञान, सामान्य ज्ञान व बौध्दिक विकास करणे, तसेच पाठ्यपुस्तकातील शिक्षणा बरोबरच सभोवतालच्या घटना, निसर्ग, पर्यावरण, निरीक्षण, आकलन करुन जिज्ञासा वाढविणे, प्रयोग, प्रात्यक्षिकाद्वारे व्यवहारातील गोष्टी समजून घेणे, यासाठी बीड जिल्हा परिषद ‘विद्यार्थी जिज्ञासा कसोटी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवित असून, याचे निश्चितच चांगले परिणाम मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.ओएमआर पद्धतीने तपासणीजिल्हा परिषद शाळेमधील इयत्ता चौथीचे ३१ हजार ७२७ विद्यार्थी १६४ केंद्रावर, तर इयत्ता सातवीचे १२ हजार ७०२ विद्यार्थी १५९ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.३० एप्रिल रोजी सकाळी ९. ३० ते ११.३० व दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत विद्यार्थी आकलन कसोटी व विद्यार्थी सामान्य, व्यवहार ज्ञान कसोटी असे दोन पेपर आहेत.प्रत्येकी २०० गुणांची परीक्षा असून परीक्षेचे स्वरुप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असे आहे.प्रश्नपत्रिका सर्व तालुक्यात वितरीत झाल्या असून ओएमआर पध्दतीने उत्तरपत्रिकांची तपासणी होणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी