शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:59 IST

वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : शासनाने फळबाग नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोध करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्याने अडीच एक्कर लिंबोणीची बाग भुईसपाट केली.

माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकरी रामभाऊ नारायण गोले  यांच्या कुटुंबांनी गेल्या दहा वर्षापुर्वी लिंबोणीची बाग लावली. गेल्या दहा वर्षांत सांभाळ करून बाग मोठी केली. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने बागेचे मोठे नुकसान झाले. मात्र, शासनाने कधीही नुकसान भरपाई दिली नाही. तसेच फळबागांचे बिट चालू करण्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अनेक आंदोलने करुनही बाजार समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने खाजगी बिटात दहा टक्के कमिशन देऊन लिंबु विक्री केली, यातून नगण्य उत्पन्न होत असल्याने शेतकरी हतबल आहेत. 

दरम्यान, एप्रिल महिन्यात वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदन देऊन २७ मे पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यास लिंबोणीची बाग तोडण्याचा करण्याचा इशारा दिल्यानंतरही शासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकरी रामभाऊ नारायण गोले याने अडीच एकरवरील लिंबोणीची बाग तोडली. तसेच ३ जुन रोजी दुपारी १२ वाजता याच लिंबोणीच्या झाडाचे सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने ॲड.नारायण गोले यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड