शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:59 IST

वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : शासनाने फळबाग नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोध करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्याने अडीच एक्कर लिंबोणीची बाग भुईसपाट केली.

माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकरी रामभाऊ नारायण गोले  यांच्या कुटुंबांनी गेल्या दहा वर्षापुर्वी लिंबोणीची बाग लावली. गेल्या दहा वर्षांत सांभाळ करून बाग मोठी केली. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने बागेचे मोठे नुकसान झाले. मात्र, शासनाने कधीही नुकसान भरपाई दिली नाही. तसेच फळबागांचे बिट चालू करण्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अनेक आंदोलने करुनही बाजार समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने खाजगी बिटात दहा टक्के कमिशन देऊन लिंबु विक्री केली, यातून नगण्य उत्पन्न होत असल्याने शेतकरी हतबल आहेत. 

दरम्यान, एप्रिल महिन्यात वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदन देऊन २७ मे पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यास लिंबोणीची बाग तोडण्याचा करण्याचा इशारा दिल्यानंतरही शासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकरी रामभाऊ नारायण गोले याने अडीच एकरवरील लिंबोणीची बाग तोडली. तसेच ३ जुन रोजी दुपारी १२ वाजता याच लिंबोणीच्या झाडाचे सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने ॲड.नारायण गोले यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड