शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:59 IST

वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव : शासनाने फळबाग नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोध करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्याने अडीच एक्कर लिंबोणीची बाग भुईसपाट केली.

माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकरी रामभाऊ नारायण गोले  यांच्या कुटुंबांनी गेल्या दहा वर्षापुर्वी लिंबोणीची बाग लावली. गेल्या दहा वर्षांत सांभाळ करून बाग मोठी केली. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने बागेचे मोठे नुकसान झाले. मात्र, शासनाने कधीही नुकसान भरपाई दिली नाही. तसेच फळबागांचे बिट चालू करण्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अनेक आंदोलने करुनही बाजार समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने खाजगी बिटात दहा टक्के कमिशन देऊन लिंबु विक्री केली, यातून नगण्य उत्पन्न होत असल्याने शेतकरी हतबल आहेत. 

दरम्यान, एप्रिल महिन्यात वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदन देऊन २७ मे पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यास लिंबोणीची बाग तोडण्याचा करण्याचा इशारा दिल्यानंतरही शासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकरी रामभाऊ नारायण गोले याने अडीच एकरवरील लिंबोणीची बाग तोडली. तसेच ३ जुन रोजी दुपारी १२ वाजता याच लिंबोणीच्या झाडाचे सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने ॲड.नारायण गोले यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड