शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘पोषण’ महिन्यात लागणार यंत्रणेचा कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:30 IST

: कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या ‘पोषण अभियान’ महत्त्वाकांक्षी कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्रकल्पात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, गतवर्षी अव्वल येणा-या जिल्ह्यातील यंत्रणेचा यंदा कस लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या ‘पोषण अभियान’ महत्त्वाकांक्षी कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्रकल्पात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, गतवर्षी अव्वल येणा-या जिल्ह्यातील यंत्रणेचा यंदा कस लागणार आहे. समुदाय आधारित उपक्रमांवर भर देत जिल्ह्यात सर्वत्र पोषण उत्सव सुरु असून या कार्यक्रमाच्या दैनंदिन नोंदी पोषण अभियानाच्या डॅश बोर्डवर आॅनलाईन होत आहेत.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग चंद्रशेखर केकान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शन व नियोजनातून जिल्हाभर पोषण उत्सव सुरु आहे. सर्व अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळांबरोबरच पालकांचा सहभाग वाढत आहे.पोषण अभियानात सर्व अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत मोबाईलच्या माध्यमातून कॅस अ‍ॅप्लिकेशन अंतर्गत सर्व रेकॉर्ड ,दैनंदिन नोंदी, वजन, उंची, आहार वाटप नोंदी आॅनलाईन होत आहेत. यातून आता वेळेवर पर्यवेक्षण होत आहे. सर्व अंगणवाडी केंद्रात सुपोषण दिवस, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, गरोदर माता नोंदणी, ग्राम आरोग्य व पोषण दिवस असे नियमित कार्यक्र म होत आहेत.पोषण महिन्यात सर्व अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने एकत्रितरित्या बालकांचे एक हजार दिवस , रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीवर घराघरात पोषण उत्सव साजरा होत आहे. यात किशोरवयीन मुली, बालके, गरोदर व स्तनदा माता ,सर्व स्त्रिया हे प्रामुख्याने लक्ष्य घटक आहेत.सर्व एकात्मिक बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, कार्यकर्ती, जिल्हा व तालुका गट समन्वयक, मदतनीसांची टीम हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहे.पोषण उत्सवासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी उद्धव सानप, महादेव जायभाये, व्यंकट हुंडेकर, रामेश्वर मुंडे, सखाराम बांगर, थोरात, शोभा लटपटे, तांदळे, दहिवाळ, कदम, बुधुक, विस्तार अधिकारी अजय निंबाळकर, वैभव जाधव, जहागीरदार, किशोर आघाव, संतोष जगताप, पन्हाळे, जिल्हा पोषण अभियान समन्वयक भूषण विडले, चाळक, तिडके आदी परिश्रम घेत आहेत.२०२२ पर्यन्त कुपोषण निर्मूलन, बाल व माता मृत्यू कमी करणे ,स्त्रिया व किशोरी यांचा अ‍ॅनिमिया कमी करणे ,जन्मत: कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी करणे या सर्वांवर एकित्रत लक्ष्यप्राप्तीसाठी ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ,माहिती व प्रसारण विभाग, समाजकल्याण विभाग ,अन्न व पुरवठा विभागाच्या एकत्रित अभिसरणातून ही मोहीम राबविली जात आहे. बालके ,किशोरी ,गरोदर व स्तनदा मातांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी जनआंदोलन उभारुन समाजात पोषण व आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfoodअन्नSchoolशाळाStudentविद्यार्थी