शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गुन्ह्याला तीन वर्ष उलटली, पण ठेवींचे काय ? महेश मोटेवरच्या अटकेचे फलित होईल का, हा प्रश्नच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 17:47 IST

Mahesh Motewar Fraud Case: देशभर गाजलेल्या समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवरला बीड शहर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे.

बीड: जादा व्याजाचे आमिष दाखवून सामान्यांना गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन मल्टिस्टेट को- ऑप सोसायटीचा ( Samruddha Jeevan Multistate Fraud Case ) संचालक महेश किसन मोतेवार (५३) ( Mahesh Motewar ) यास शहर पोलिसांनी अटक केली, पण या गुन्ह्याला तीन वर्षे उलटून गेली. शिवाय मोतेवारवर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे अटकेचे फलित होईल का, हा प्रश्नच आहे (What is the result of Mahesh Motewar's arrest?) . तपास सक्षम यंत्रणेकडे सोपविण्याची मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे.

देशभर गाजलेल्या समृद्ध जीवन मल्टिस्टेटच्या साडेचार हजार कोटींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड महेश मोतेवरला बीड शहर पोलिसांनी गुजरातच्या राजकोट मध्यवर्ती कारागृहातून १७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले होते. १९ रोजी न्यायालयाने त्यास सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मोतेवारवर २२ राज्यांत २८ गुन्हे नोंद असून बीडमध्ये पाच कोटींच्या अपहारप्रकरणी ३० ऑगस्ट २०१८ रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याऐवजी तो शहर ठाण्याकडेच राहिला. परिणामी तीन वर्षे उलटूनही यात कुठलाही तपास झाला नाही. संस्थेने गाशा गुंडाळल्याने कुठलेही पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी ठेवीदारांना आवाहन केल्यावर सुमारे दोन ते अडीच हजार ठेवीदारांनी कागदपत्रे सादर केली. त्यानुसार मूळ एफआयआरमधील पाच कोटींच्या अपहाराचा आकडा २५ कोटी रुपयांच्या घरात गेला. त्यामुळे बीडमधील घोटाळा ५० कोटी रुपयांपर्यंत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सीआयडीला सगळे पुरावे दिले...२० नोव्हेंबर रोजी महेश मोतेवारची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तपास अधिकारी रवी सानप यांनी चौकशी केली, तेव्हा त्याने पुणे सीआयडीने केलेल्या अटकेवेळी त्यांनी हार्डडिस्क व इतर पुरावे जप्त केले. त्यामुळे आता कुठले पुरावे शिल्लक राहिले नाहीत, असा दावा त्याने केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सखोल तपास का नाही ?या प्रकरणात आतापर्यंत उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तपास होता. दोन महिन्यांपूर्वी तो उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांच्याकडून पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्याकडे सोपवला. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेसारखी सक्षम यंत्रणा असताना शहर ठाण्याकडेच गुन्हा का ठेवला, असा प्रश्न फिर्यादी सय्यद रहेमा सय्यद नियामत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस महानिरीक्षकांपासून ते महासंचालकांपर्यंत पत्रव्यवहार करून सखोल तपासासाठी प्रकरण वर्ग करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी