शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:44 IST

जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात थट्टा : संतापलेल्या शेतकऱ्यांचा विमा कंपनी कार्यालयात गोंधळ

बीड : जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. बुधवारी पीक विम्याची माहिती विचारण्यासाठी गेल्यावर अधिकारी, कर्मचाºयांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनी कार्यालयात गोंधळ घातला. शासनाने दुष्काळात शेतकºयांची थट्टा मांडल्याचे दिसत आहे.कृृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १४ लाख ११ हजार शेतकºयांनी सहभाग नोंदविलेला आहे. तूर, उडीद, मुगाचा विमा शेतकºयांना मिळालेला आहे. मात्र, सोयाबीन विम्यासाठी मागील महिनाभरपासून शेतकरी त्रस्त आहेत. आज, उद्या करून विमा कंपनीकडून शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होते. अखेर गुरूवारी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना सोयाबीनचा विमा प्राप्त झाला. मात्र, काही शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरंन्स’चे कारण पुढे करीत विमा नाकारला आहे.योग्य विमा भरल्यानंतरही आपल्याला विमा न मिळाल्याने शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतापले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. समजूतीनंतर शेतकºयांचा राग शांत झाला.दरम्यान, अगोदरच दुष्काळ अन् त्यात यावर्षी पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच आता विमा कंपनीकडून शेतकºयांच्या दुखा:वर मीठ चोळण्याचे काम होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा विमा सरकट वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांची अरेरावीआष्टी, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी शेकडो किलोमिटर अंतर कापून बीडच्या ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात विम्याची माहिती विचारण्यासाठी आले होते.येथे शेतकºयांना माहिती देण्याऐवजी अधिकारी, कर्मचाºयांनी अरेरावी करीत त्यांना बाहेर काढले. यामुळेच शेतकरी संतापल्याचे सांगण्यात आले.काही शेतकºयांनी तर आपला रूद्रावतार दाखविण्यास सुरूवात केली. मात्र इतरांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कंपनीच्या मुजोर अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांची थट्टा मांडल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलनCrop Insuranceपीक विमा