शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:44 IST

जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात थट्टा : संतापलेल्या शेतकऱ्यांचा विमा कंपनी कार्यालयात गोंधळ

बीड : जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. बुधवारी पीक विम्याची माहिती विचारण्यासाठी गेल्यावर अधिकारी, कर्मचाºयांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनी कार्यालयात गोंधळ घातला. शासनाने दुष्काळात शेतकºयांची थट्टा मांडल्याचे दिसत आहे.कृृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १४ लाख ११ हजार शेतकºयांनी सहभाग नोंदविलेला आहे. तूर, उडीद, मुगाचा विमा शेतकºयांना मिळालेला आहे. मात्र, सोयाबीन विम्यासाठी मागील महिनाभरपासून शेतकरी त्रस्त आहेत. आज, उद्या करून विमा कंपनीकडून शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होते. अखेर गुरूवारी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना सोयाबीनचा विमा प्राप्त झाला. मात्र, काही शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरंन्स’चे कारण पुढे करीत विमा नाकारला आहे.योग्य विमा भरल्यानंतरही आपल्याला विमा न मिळाल्याने शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतापले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. समजूतीनंतर शेतकºयांचा राग शांत झाला.दरम्यान, अगोदरच दुष्काळ अन् त्यात यावर्षी पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच आता विमा कंपनीकडून शेतकºयांच्या दुखा:वर मीठ चोळण्याचे काम होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा विमा सरकट वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांची अरेरावीआष्टी, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी शेकडो किलोमिटर अंतर कापून बीडच्या ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात विम्याची माहिती विचारण्यासाठी आले होते.येथे शेतकºयांना माहिती देण्याऐवजी अधिकारी, कर्मचाºयांनी अरेरावी करीत त्यांना बाहेर काढले. यामुळेच शेतकरी संतापल्याचे सांगण्यात आले.काही शेतकºयांनी तर आपला रूद्रावतार दाखविण्यास सुरूवात केली. मात्र इतरांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कंपनीच्या मुजोर अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांची थट्टा मांडल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलनCrop Insuranceपीक विमा