शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:44 IST

जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे.

ठळक मुद्देदुष्काळात थट्टा : संतापलेल्या शेतकऱ्यांचा विमा कंपनी कार्यालयात गोंधळ

बीड : जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. बुधवारी पीक विम्याची माहिती विचारण्यासाठी गेल्यावर अधिकारी, कर्मचाºयांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनी कार्यालयात गोंधळ घातला. शासनाने दुष्काळात शेतकºयांची थट्टा मांडल्याचे दिसत आहे.कृृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १४ लाख ११ हजार शेतकºयांनी सहभाग नोंदविलेला आहे. तूर, उडीद, मुगाचा विमा शेतकºयांना मिळालेला आहे. मात्र, सोयाबीन विम्यासाठी मागील महिनाभरपासून शेतकरी त्रस्त आहेत. आज, उद्या करून विमा कंपनीकडून शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होते. अखेर गुरूवारी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना सोयाबीनचा विमा प्राप्त झाला. मात्र, काही शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरंन्स’चे कारण पुढे करीत विमा नाकारला आहे.योग्य विमा भरल्यानंतरही आपल्याला विमा न मिळाल्याने शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतापले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. समजूतीनंतर शेतकºयांचा राग शांत झाला.दरम्यान, अगोदरच दुष्काळ अन् त्यात यावर्षी पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच आता विमा कंपनीकडून शेतकºयांच्या दुखा:वर मीठ चोळण्याचे काम होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा विमा सरकट वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांची अरेरावीआष्टी, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी शेकडो किलोमिटर अंतर कापून बीडच्या ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात विम्याची माहिती विचारण्यासाठी आले होते.येथे शेतकºयांना माहिती देण्याऐवजी अधिकारी, कर्मचाºयांनी अरेरावी करीत त्यांना बाहेर काढले. यामुळेच शेतकरी संतापल्याचे सांगण्यात आले.काही शेतकºयांनी तर आपला रूद्रावतार दाखविण्यास सुरूवात केली. मात्र इतरांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कंपनीच्या मुजोर अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांची थट्टा मांडल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलनCrop Insuranceपीक विमा