शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना, जळगाव तलावाचा सांडवा रात्रीतून फुटला की फोडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:25 IST

आधीच पुरसा पाऊस न झाल्याने पाणी टंचाई; त्यात सांडवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया!

- नितीन कांबळेकडा- शेतकरी दुष्काळी संकटाच्या छायेत असताना अचानक पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पावसाने अनेक तलावात पाणीसाठा वाढला आहे. मात्र, जळगाव येथील तलावाचा सांडवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हा सांडवा फुटला की अन्य कोणी फोडला असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

आष्टी तालुक्यातील जळगाव येथे २००२ साली साठवण तलाव बांधण्यात आला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे मोठे संकट ओढावले असताना मागील तीन दिवसांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे अनेक तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी आले. काही तर तुडूंब भरून वाहत आहेत. यातच मंगळवारी रात्री तलावाच्या सांडव्यातून एका बाजूने पाणी वाहू लागला. हा सांडावा फुटून त्यातून लाखो लिटर पाणी बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, अचानक पाणी वाया जात असल्याने सांडवा फुटला की फोडला यावर शंका आहे. सध्या सांडव्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने गांभीर्याने यावर उपाययोजना कराव्यात, उंची वाढवावी तसेच सांडावा कसा फुटला याची चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच राम धुमाळ यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसBeedबीडFarmerशेतकरी