शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आत्महत्येचा विचार येतोय ? येथे कॉल करा, टेन्शन फ्री व्हा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 07:44 IST

अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम आरोग्य विभागाच्या टेली मानस केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. कुणी नैराश्यात असेल तर १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा,  मोफत उपचार, सल्ला घ्या, असे आवाहन या केंद्राकडून करण्यात येते.  वर्षभरात १७ हजार लोकांना सेवा देऊन अंबाजोगाईचे केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे.

तज्ज्ञांकडून समुपदेशनअंबाजोगाईसह (लोखंडी सावरगाव), पुणे आणि ठाणे या ठिकाणी टेली मानस केंद्र सुरू आहे. येथे मानसोपचार तज्ज्ञांसह समुपदेशकांची नियुक्ती आहे. कोणत्याही व्यक्तीला मानसिक आजारासंदर्भात तक्रार असल्यास त्यांना मोफत सल्ला देण्यासाठी हे टेली मानस केंद्र आधार देते. 

निदान, उपचार व सल्लाव्यसनमुक्ती, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या यावर उपचार व सल्ला दिला जातो. हे सर्व मोफत आहे.

४५,०००लोकांना या सेवेच्या माध्यमातून वर्षभरात सल्ला व उपचार करण्यात आले. 

कधीही कॉल करा, २४ तास सेवाn१४४१६ हा टोल फ्री क्रमांक २४ तास चालू असतो. nदर सहा तासांना ५ समुपदेशक, एक मानसोपचार तज्ज्ञ कर्तव्यावर.  nगरजू कोणत्याही वेळेत निसंकोचपणे कॉल करू शकतात.    

टॅग्स :Healthआरोग्य