शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:27 IST

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी सुरू आहे. या मागणीसाठी राज्यभरात मूक मोर्चे सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी परभणी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ आता ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरू आहेत. जरांगे पाटील ंयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरू आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

'मंत्री धनंजय मुंडे राज्यात जातीयवाद करत आहेत, ते टोळ्या पाळत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. आमची लढाई आरक्षणाचीच आहे पण तुम्ही लोकं मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का? यात जातीचा संबंध आला कुठुन? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.

धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ही तत्परता धनंजय मुंडे आणि त्यांनी टोळ्या पाळल्या आहेत.लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडणी वसुल करण्यासाठी. ही तत्परता त्यांनी त्यावेळी दाखवायला हवी होती. संतोष देशमुख यांचा मृतदेह दोन दिवस केज येथील रुग्णालयात पडून होता. त्यावेळी मस्साजोग गाव रस्त्यावर होते, त्यांनी तत्परता दाखवायला हवी होती. त्यांचे गुंड लोक देशमुख यांच्या भावाला धमक्या द्यायला लागले, तरीही आम्ही बोलायचं नाही का? असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

"धनंजय देशमुख आज न्यायासाठी फिरत आहे. त्यांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांच्या न्यायासाठी बोलायचं नाही का? त्यांच्या जातीच्या लोकांना यांना न्याय मिळावा असं वाटत नाही का? या घटनेत जातीच काय आलं?, असंही जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडे राज्यात टोळ्या पाळत आहेत, जातीयवाद करत आहेत, असा आरोपही केला. मी गुंडांना बोललो, कुठल्या जातीला बोललो नाही, या प्रकरणात मराठा, ओबीसी संबंध येतो कुठे?, असंही जरांगे पाटील म्हणाले.

परळी, बीड, अंबाजोगाईनंतर धारूरमध्ये जरांगेंवर गुन्हा नोंद

संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी परभणी येथे निघालेल्या मोर्चानंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख करत व मराठा आणि वंजारा समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. बीड जिल्ह्यातील वंजारा समाजसह ओबीसी समाजाने याचा निषेध नोंदवत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. परळी येथील शिवाजीनगर पोलीसांत सात तास हे आंदोलन केल्यानंतर जरांगे यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला होता. धारूर येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDhananjay Mundeधनंजय मुंडे