शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

२५ वर्षांत कधी नव्हते असे पीक आले पण दृष्ट लागली...स्वप्नांवर पाणी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:18 IST

पावसाने सर्व काही संपल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यातील घळाटवाडीच्या शेतकऱ्यांची व्यथा

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव (जि. बीड) :  मागील २५ वर्षांत कधी नव्हती अशी पिके आल्याने किती माल निघेल आणि  किती नाही, असे वाटत असताना दृष्ट लागल्यासारखे झाले. २०-२५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्व काही संपल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगताना  तालुक्यातील घळाटवाडीचे शेतकरी रडकुंडीला आले होते.  

प्रस्तुत प्रतिनिधीने पाहणी केली असता शेतकरी त्यांच्या व्यथा मांडत होते. घळाटवाडी परिसरात  चार- पाच वर्षांपासून सतत पडत असलेला दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र यावर्षी अनियमित असूनही गरजेच्या वेळी पडलेल्या पावसामुळे पीक परिस्थिती अतिशय उत्तम होती. सोयाबीन व बाजरी  काढायला आली होती तर कापूस फुटला होता. परंतु २०-२५  दिवसांपासून  मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. या गावच्या उत्तरेला असलेल्या घळाटी नदीला अनेक वेळा पूर आल्याने आजूबाजूच्या शेकडो हेक्टर जमिनीतील वाहून गेलेली पिके नदीकाठच्या बाभळीच्या झाडांना अडकलेली होती. तर  सोयाबीन खाली गळाल्याने अनेक शेतात सोयाबीन पुन्हा उगवलेले दिसले.  काही शेतकऱ्यांनी थोडाफार वेचलेला कापूस वाळू घातला, पण त्याच्याही फकड्या झाल्या होत्या.

स्वप्नांवर पाणी...मी मागील चाळीस वर्षांपासून शेती करीत असून माझ्या बघण्यात अशी पिके आली नाहीत. ५-६ वर्षांच्या दुष्काळानंतर चांगली पिके आल्याने यावर्षी आपण कर्जमुक्त होऊ, असे वाटले होते; परंतु हे नियतीला मान्य नव्हते. माझ्याकडे सोळा एकर जमीन असून, दहा ते बारा लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबून होती. महिन्यापासून हाताला काम नाही. आता काय खावे, अशी अवस्था झाल्याचे प्रकाश माने म्हणाले.  मागील अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात ओल असल्याने शेतात काम करणे अवघड झाले. महिन्यापासून आम्हाला रोजगार मिळत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे गणेश माने व शाम काळे यांनी सांगितले. ओला कापूस वेचायलाही मजूर मिळणे अवघड झाले आहे, असे शेतकरी केशव पठाडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीडRainपाऊस