शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

बीड जिल्ह्यात पावसाने सलामी दिली; पण धरणांची पातळी नाही वाढली

By शिरीष शिंदे | Updated: June 19, 2024 17:20 IST

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, धरणात ३ टक्केच जीवंत पाणीसाठा 

बीड : १ जूनपासून बीड जिल्ह्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाली असली तरी त्याचा लाभ लहान-मोठ्या धरणांना झाला नाही. अद्याप ६२ धरणे जोत्याखालीच असून केवळ ३ टक्केच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळ्याची सुरुवात मृग पावसाने झाली असल्याने पुढील काळात मोठे पाऊस होऊन धरणे भरतील अशी सकारात्मक आशावाद शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे.

आतापर्यंतच्या अनुभवानुसार, जून महिन्यात फारसा पाऊस होत नाही. त्यामुळे पेरण्या मागे पुढे होतात, त्याचा परिणाम उत्पादनावर सुद्धा होतो. परंतु यंदा जून महिना सुरू होण्यापूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी बाजरीचे नुकसान झाले तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस सुद्धा झाला होता. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अवकाळी पावसाने जोर धरला होता. त्यानंतर १ जूनपासून मौसमी पावसाला सुरुवात झाली होती. बीड जिल्ह्यात १ ते १२ जून या कालावधीत १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्हाभरात ४.९१ टक्के पेरणी झाली आहे. वास्तविक: धरण क्षेत्रात हा पाऊस झालेला नाही. काही भागात नद्यांना पाणी आल्याचे दिसून आले मात्र धरणे अद्यापही कोरडीच आहेत. सध्याच्या पावसाची सकारात्मक स्थिती पाहता पुढील काळात मोठे पाऊस होऊन धरणे भरतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

३.३५ टक्केच उपयुक्त पाणीसाठाबीड जिल्ह्यात लहान मोठ्या १४३ धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा २३.९८९ दलघमी असून त्याची टक्केवारी ३.३५ एवढी आहे. जिल्ह्यात सर्वात मोठ्या माजलगाव प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा राहिलेला नाही तर मध्यम व लघु गोदावरी खोऱ्यातील प्रकल्पात २३.९८९ दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पातील पाणीसाठा कमी आहे. नुकत्याच झालेल्या पावसाचा फारसा परिणाम धरणांमध्ये दिसून आलेला नाही.

अशी आहे प्रकल्पातील पाणी परिस्थितीप्रकल्प-२५ टक्के पाणी-जोत्याखाली-कोरडे प्रकल्पमाजलगाव-०-१-०मध्य-४-७-४लघु-१९-५४-४५एकूण-२३-६२-४९

अद्यापही टँकर सुरूचजिल्हाभरात मागील १२ दिवसांमध्ये चांगला पाऊस हाेत असला तरी सर्व परिस्थिती बदलली अशा मधला भाग नाही. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानंतर पाणी पातळी वाढते. त्यानंतर कोरड्या पडलेल्या विहीर, बोअरला पाणी येते. आता पाऊस झाला अन् लगेचच पाणी येईल असे होत नाही. अनेक पाऊस झाल्यानंतर धरणात पाणी वाढेल, मग जमिनीतील पाणी पातळी वाढल्यानंतर ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मार्गी लागले.

धरण क्षेत्रात पाऊस होणे आवश्यकसद्यस्थितीला ग्रामीण भागात पाऊस होत आहे. परंतु धरण क्षेत्रात मोठे पाऊस होणे आवश्यक आहेत. मागच्या वर्षी सरासरीच्या एकूण ७१ टक्के पाऊस झाला होता. परंतु धरणात पाणीसाठाच झाला नव्हता. त्यामुळे आगामी पाऊस धरण क्षेत्रात झाल्यास त्या-त्या भागातील पाणी परिस्थितीमध्ये सुधारणा होते. तसेच शेतीसाठी मुबलक पाणीसाठा निर्माण होता.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीBeedबीड