शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढल्याचा मुद्दा दिल्लीत गाजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:35 IST

महाराष्ट्र शासनाकडूनही गंभीर दखल; महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी बुधवारी राज्यसभेत यावर लेखी माहिती देत खुलासा केला.

बीड : जिल्ह्यातील ८४३ महिलांची २०२५ पूर्वीच्या अनेक वर्षांत गर्भपिशवी काढल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला होता. या मुद्यावर ‘लोकमत’ने २ जून रोजी वृत्त प्रकाशित करत प्रकाश टाकला होता. त्यानंतर शासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. पत्र काढत बैठकाही घेतल्या. त्यावर बीडच नव्हे, तर राज्याचा आरोग्य विभागही सतर्क झाला. आता हाच मुद्दा दिल्लीत संसदेतही गाजला आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी बुधवारी राज्यसभेत यावर लेखी माहिती देत खुलासा केला.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमधून प्रत्येक वर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीला जातात. यापैकी ७८ हजार महिला, तर ९६ हजार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ८४३ महिलांची ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचे समोर आले होते. यात ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांचा समावेश होता. तसेच १५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले होते. यावरच प्रकाश टाकल्यावर आरोग्य विभागाने याबाबत सहकार, कामगार, आरोग्य विभागासह इतर संंबंधित विभागांना कडक सूचना देत सतर्कता बाळगण्यास सांगितले होते.

८४३ शस्त्रक्रिया कधी झाल्या?जिल्ह्यातील ८४३ गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा खुलासा आरोग्य विभागाने केला. यात २०१९ नंतर २६७ आणि त्यापूर्वी ५७६ शस्त्रक्रिया झाल्याची नाेंद आहे. तसेच कोणत्या वर्षी किती झाल्या, याचीही माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काय म्हणाल्या ठाकूर?बीड जिल्ह्यात २०२२-२५ दरम्यान २११ महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. वैद्यकीय गरजेपोटी झालेल्या या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीनेच होतात. ऊसतोड कामगारांमधील अडचणींवर उपाय म्हणून, राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी आरोग्य तपासणी आणि प्रजनन आरोग्य जनजागृती मोहीम राबवली आहे, ज्यात अनावश्यक शस्त्रक्रियांचे धोके आणि कुटुंब नियोजन पद्धतींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता खात्री करूनच परवानगीजून महिन्यात हा मुद्दा समोर आल्यानंतर आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. खासगीतून आलेल्या प्रस्तावाची उलट तपासणी करून गरज असेल तरच परवानगी दिली जात आहे. अनावश्यक शस्त्रक्रिया होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही याबाबत राज्यस्तरावर बैठक घेतली होती.

कारवाई केली जाते२०१९ मध्ये ठरलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महिला रुग्ण आल्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी होते. त्यानंतरच गरज असेल तर शस्त्रक्रियासाठी परवानगी दिली जाते. जसे जिल्हास्तरावर आहे, तसेच तालुकास्तरावरही कारवाई केली जाते.- डॉ. संजय राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेWomenमहिला