शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वडील म्हणाले, यायला उशीर का झाला, एकुलत्या एक मुलाने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 11:32 IST

तरुणास दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्यासाठी वधूशोध सुरू होता.

बीड : घरी यायला उशीर का झाला, अशी विचारणा केल्याने दारूच्या नशेत असलेल्या एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ६ जून रोजी तालुक्यातील उमरद खालसा येथे उघडकीस आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रकांत भारत जाधव (२५, रा. उमरद खालसा, ता. बीड) असे मयताचे नाव आहे.

तो बीडमध्ये शिवणकाम करायचा. ४ जून रोजी रात्री साडेदहा वाजता तो घरी पोहोचला. त्यामुळे वडील भारत जाधव यांनी त्यास टोकले. इतका उशीर का झाला, अशी विचारणा त्यांनी केली. तो नशेत असल्याने आईनेही त्यास समज देण्याचा प्रयत्न केला. शिवाय लवकर जेवायला ये, असे सांगितले. मोबाइल चार्जिंगला लावून येतो, असे सांगून आतील खोलीत गेल्यावर चंद्रकांत जाधव याने लोखंडी हूकला दोरीने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच आई-वडिलांनी त्यास फासावरून खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ६ जून रोजी सकाळी साडेसहा वाजता त्याचा मृत्यू झाला. भारत जाधव यांच्या जबाबावरून जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद झाली. पो. ना. सखाराम माने यांनी पंचनामा केल्यावर उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.

लग्नासाठी सुरू होता वधूशोधदरम्यान, चंद्रकांत जाधव यास दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्यासाठी वधूशोध सुरू होता. काही स्थळेही आली होती. मात्र, त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाने आपली जीवनयात्रा संपविल्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड