शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील धरणे आटली, तहान भागेना; ५४ प्रकल्प मृत साठ्यात, ५२ कोरडे

By शिरीष शिंदे | Updated: May 20, 2024 16:42 IST

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे.

बीड : एप्रिल व मे महिन्यात पडलेल्या तीव्र उन्हामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. १४३ धरणांमध्ये केवळ ४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. माजलगाव धरणासह ५४ प्रकल्प मृतसाठ्यात गेले असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस येणे आवश्यक आहे.

बीड जिल्ह्यात मागच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपातळी खालावली असल्याने अनेक गाव-वाड्या, तांड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ६ लाख ४३ हजार लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या १० मे रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३८२ टँकरच्या माध्यमातून ११ तालुक्यांतील ६ लाख ४३ हजार १०२ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

दरम्यान, मागच्या वर्षी पाऊस झाला, परंतु धरणक्षेत्र परिसरात झाला नाही. धरणात पाणीसाठा झाला तर आसपासच्या गावांतील जमिनीतील पाणीपातळी वाढलेली राहते. धरणांमध्ये पाणीसाठा झाला नसल्याने धरण परिसरातील पाणीपातळीसुद्धा खालावली आहे. आता ज्या ठिकाणी जलस्रोत शिल्लक आहे त्याच ठिकाणावरून पाणीउपसा केला जात आहे. सद्यस्थितीला जवळपास सर्व धरणांमधील पाणीसाठा संपत आला आहे. ही बीड जिल्हावासीयांसाठी चिंताजनक बाब आहे.

हवामान विभागाच्या अंदाजामुळे दिलासाहवामान विभागाच्या अंदाजानुसार ३१ मे रोजी माॅन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर ७ जून पूर्वीपासूनच पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आले. तसेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे हवामानतज्ज्ञ सांगत आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

५२ प्रकल्प पडले काेरडेबीड जिल्ह्यातील १४३ पैकी ५२ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५४ पाणी प्रकल्प जोत्याखाली आहे. तसेच २७ प्रकल्पामध्ये २५ टक्के, ७ प्रकल्पामध्ये २५ ते ५० टक्के तर ३ प्रकल्पामध्ये ५० ते ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. कोरड्या पडलेल्या पाणी प्रकल्पातून पाणी काढता येणे शक्य नाही, परंतु जी प्रकल्प जोत्याखाली आहेत, त्यातून थोडाफार पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो.

उपयुक्त पाणीसाठा ४.७२ टक्केचधरणे मृतसाठ्यात असली तर त्यातील थोडाफार पाणीउपसा केला जाऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये आज रोजी ४.७२ ऐवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातील १०.६०६ एवढा दलघमी प्रत्यक्ष पाणीसाठा आहे. त्यातून काही दिवस बीडकरांची तहान भागवली जाऊ शकते. पावसाळा सुरू होणार असल्याने पुढील काळात फारशी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही असा विश्वास अनेकांना आहे. मे अखेरपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होत असल्याचे अनुभव अनेकांना आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता देखील कमी होईल व पाण्याची चिंता मिटेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

प्रकल्प -संख्या-जोत्याखाली-कोरडेमाजलगाव प्रकल्प -१-०मध्यम -५-३लघु -४८-४९एकूण- ५४-५२

टॅग्स :Beedबीडwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी