शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रानडुकरांमुळे बैल बिथरून बैलगाडीसह तलावात शिरले; आजोबा अन् नातू बुडून गतप्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:02 IST

शेतात निघालेल्या आजोबांसह नातवाचा तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

दिंद्रुड (बीड): रानडुकराच्या हल्ल्याने बिथरलेली बैल बैलगाडीसह तलावात शिरली. यावेळी बैलगाडीत असलेल्या आजोबाचा आणि एका नातवाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एक नातू बैलावर बसून बाहेर आल्याने बचावला. या घटनेत एक बैल देखील दगावला आहे. मृत शेतकरी असून धारूर तालुक्यातील कासारी येथील रहिवासी होते. 

कबीर बाशुमिया सय्यद (वय 70 वर्ष) हे आपला नातू आजमत अखिल सय्यद (वय दहा वर्ष)व आतिक अखिल सय्यद (वय १२वर्ष) या दोन नातवांसमवेत कासारी शिवारातील बालाघाट डोंगरात असलेल्या वाघदरा तलावाच्या मार्गाने शेताकडे आज गुरुवारी दुपारी बारा वाजे दरम्यान निघाले होते. याच दरम्यान तलावाच्या काठावर असलेल्या रानडुकरांनी बैलांवर हल्ला केल्याने बैल बिथरले आणि तलावाच्या पाण्यात शिरले. पाण्यातून बैल वेगाने जात असताना बैलगाडीसह त्यातील आजोबा आणि नातू बुडाले. 50 फूट बैलगाडीला बैलांनी ओढत नेत होते. यात कबीर सय्यद व आजमत सय्यद या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आतिक अखिल सय्यद हा एका बैलावर बसून तलावा बाहेर आला त्यामुळे तो वाचला. 

ही थरारक घटना तलावाजवळ जनावरे चालत असलेल्या मोतीराम सदाशिव उघडे या शेतकऱ्याने पाहिली. त्यांनी आरडाओरडा केल्याने तलावाकडे आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. तलावात उडी घेत शेतकऱ्यांनी दोन्ही बैलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत कबीर सय्यद व आजमत सय्यद या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मयतांचा पंचनामा करत शव भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कासारीसह धारूर तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

 

 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू