शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
5
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
6
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
7
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
8
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
9
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
10
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
11
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
12
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
13
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
14
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
15
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
16
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
17
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
18
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
19
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
20
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट

शिक्षकांवर इतर कामांचेच ओझे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST

बीड : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाच्या बोजामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षकांना केवळ शैक्षणिक व अध्यापनाचे ...

बीड : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाच्या बोजामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षकांना केवळ शैक्षणिक व अध्यापनाचे काम दिल्यास गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकेल. शिक्षकांना अशैक्षिणक कामे देऊ नयेत, अशी मागणी वारंवार होत असली तरी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ही कामे करणे क्रमप्राप्त ठरत असल्याने व शासनाचेच निर्देश असल्याने शिक्षकांना निमुटपणे ही कामे करावी लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपातळीवरील कोणत्याही योजना असोत, अथवा राष्ट्रीय कार्यक्रम शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते. मतदारांची नोंदणी किंवा निवडणूक ब्लॉक लेवल ऑफिसरचे काम असो नेहमी इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकही ते सांभाळतात. जनगणनेचे काम असेल किंवा राष्ट्रीय कार्यक्रमात संबंधित विभागाला पूरक म्हणून शिक्षकांवर जबाबदारी दिली जाते. शासन निर्देशामुळे शिक्षकांना मूळ काम कमी आणि इतर कामे जास्त करण्याची वेळ येत आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये जिल्हा सीमेपासून गाव सीमेपर्यंत शिक्षकांना कर्तव्य बजावावे लागले. त्याचबरोबर रुग्णांच्या आणि शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या नोंदणीपासून त्यांच्या एकूण आजाराबद्दलची माहिती घेण्यासाठी संवाद साधणे, ती माहिती शासनाकडे परिपूर्ण करून देणे, लॉकडाऊन काळात शिक्षकांना नेमून दिलेल्या भागातील संबंधित किराणा दुकानातून नागरिकांच्या घरापर्यंत साहित्य पोहोचविण्याची जबाबदारीदेखील देण्यात आली होती, हे विशेष. शाळा सुरू असो वा नसो अशा विविध कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतानाच विविध शिक्षक संघटना विरोध दर्शवितात. मात्र, अनेक कामे राष्ट्रीय उपक्रमातील असल्यामुळे विरोधाचा सूर मंदावतो.

शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी दिली तर ते अतिरिक्त बोज्यातून मुक्त होऊ शकतील. मात्र, शासनाची योजना राबविताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत शिक्षकांना कामाला लावले जाते. अशा कामांसाठी अस्थायी स्वरूपात अतिरिक्त बळ उभे केल्यास शिक्षकांवरील ताण कमी होईल व शासनाच्या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल, असा सूर शिक्षक संघटनांमधून उमटला.

-------

शिक्षकांना जवळपास ४० ते ४५ शैक्षणिक कामे वेगवेगळ्या वेळेला करावी लागतात. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असे शासनाचे, तसेच न्यायालयाचे आदेश आहेत. जवळजवळ ८० टक्के शाळा या द्विशिक्षकी आहेत. या सर्व कामांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

-राजेंद्र खेडकर, राज्य संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.

------

बीड जिल्ह्यात एकशिक्षकी शाळा आता नाहीत, तर १४९७ द्विशिक्षकी शाळा आहेत. शासकीय योजना अथवा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीदरम्यानची कामे करण्यासाठी एक शिक्षक पूर्णवेळ गुंतून पडतो. त्यामुळे दुसऱ्या शिक्षकावरही कामाचा ताण येतो. शासनाच्या शालेय पोषण आहारांतर्गत धान्याचे विद्यार्थ्यांना वाटप, तसेच त्याची माहिती संकलित करणे, कृषी, आरोग्य विभागाच्या विविध योजनेत पूरक कामे शिक्षकांना करावी लागतात. मतदार नोंदणी, विविध योजनांचे सर्वेक्षण, नोंदणी व इतर माहिती संकलनासोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, पोषण आहाराचे वाटप करणे, शाळा पातळीवर व्यवस्थापनाचे काम करावे लागते.

----------

किती शिक्षक अशैक्षणिक कामकाजात सहभागी होतात, असा प्रश्न करीत सामाजिक भावनेतून प्रसंगी आरोग्याबाबत जोखीम स्वीकारून अनेक शिक्षक काम करतात; परंतु अनेक शिक्षक पुढारीपणातून जबाबदाऱ्या टाळून अतिरिक्त कामांचा बोजा म्हणत ओरड करतात. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांनी अध्यापनाची जबाबदारी सांभाळून ही कामे करायला हवीत, असे मत अनेक शिक्षकांनी मांडले.

---------

जिल्ह्यातील जि.प. शाळा - २४९१

शिक्षक -९४६९

विद्यार्थी - १,७५,५३३

------