शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचे बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:01 IST

युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : भाजपवर साधले शरसंधान; घोषणांचे जुमले सुरु असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाडा दुष्काळाने होरपळतोय प्रशासकीय यंत्रणेला देणेघेणे नाही, तिकडे सरकारने १० हजार कोटींच्या कर्जमाफीची घोेषणा केली, दिले काय? शेतकºयांचा सर्वत्र आक्रोश आहे. त्यांना काम, चारा, पाणी पाहिजे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बीड येथे आले होते. यावेळी शेतक-यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्या हस्ते झाले.ठाकरे म्हणाले, कोरडी भाषणे आणि घोषणा देऊन जमत नसते. चारा छावणीला की दावणीला असा घोळ सुरुच आहे. सरकारला यंत्रणा राबवता येत नाही, आमची यंत्रणा समोर असल्याचे सांगत उपस्थित श्रोत्यांकडे अंगुलीनिर्देश केला. विहिरी, जलाशये कोरडे आहेत. त्यामध्ये पाणी नाही, परंतु शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आहे. दुष्काळ सदृष्य म्हणत खेळ चालवलाय, केंद्रीय पथक आले, मिळाले काय? हे पथक लेझीम पथक होते का? गाजर दाखवता पण गाजरही देत नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला.यावेळी उज्वला योजनेचे कनेक्शन किती जणांना मिळाले? पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? कर्जमाफी किती जणांना झाली? असे प्रश्न विचारत ठाकरे म्हणाले, कर्जमाफी नव्हे शिवसेनेला कर्जमुक्ती पाहिजे. अन्नदात्याला खोटं बोलून फसवतात? कर्जमाफी का झाली नाही? पात्र ठरुनही कर्जमाफी मिळत नाही. घोषणांचे सोंग आणि ढोंग करु नका अशी टीका करताना मी ‘मन’ की नव्हे ‘जन की बात’ करतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.राम मंदिराबाबत सरकारच्या भूमिकेवर बोलताना ठाकरे म्हणाले, हा विषय घटनापीठाकडे टोलविला. मग निवडणूक जाहीरनाम्यात का उल्लेख केला ? मंदिर वहीं बनायेंगे, तारिख नहीं बतायेंगे असेच चालले आहे. शिवसेना मात्र पहले मंदिर फिर सरकार यावर ठाम असल्याचे ते म्हणाले.जुमल्यावर जुमले, घोषणांचे जुमले सुरु आहेत. रामाचासुद्धा जुमला करत आहेत. घोषणांचा पाऊस करुन दुष्काळग्रस्त जनतेचे हंडे भरणार नाहीत, केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा, तुमचे दिवसच किती उरले? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.केवळ जनतेसाठी दुष्काळ नसून बीड जिल्ह्यात राजकारणासाठी शिवसेनेचा दुष्काळ आहे. शिवसेनेचा राजकीय दुष्काळ हटविण्याचे आवाहन करताना ‘दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर’ असल्याचे ठाकरे म्हणाले.‘लोकमत’ लोकांचे मतसरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी ९ जानेवारी रोजीच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणा-यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीने छापली होती.याचा उल्लेख करून ते म्हणाले की, ‘लोकमत’ने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’चा अंक दाखवून केला.

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा