शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचे बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:01 IST

युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : भाजपवर साधले शरसंधान; घोषणांचे जुमले सुरु असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मराठवाडा दुष्काळाने होरपळतोय प्रशासकीय यंत्रणेला देणेघेणे नाही, तिकडे सरकारने १० हजार कोटींच्या कर्जमाफीची घोेषणा केली, दिले काय? शेतकºयांचा सर्वत्र आक्रोश आहे. त्यांना काम, चारा, पाणी पाहिजे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले.जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बीड येथे आले होते. यावेळी शेतक-यांना पशूखाद्य, पाण्याच्या टाक्याचे वाटप त्यांच्या हस्ते झाले.ठाकरे म्हणाले, कोरडी भाषणे आणि घोषणा देऊन जमत नसते. चारा छावणीला की दावणीला असा घोळ सुरुच आहे. सरकारला यंत्रणा राबवता येत नाही, आमची यंत्रणा समोर असल्याचे सांगत उपस्थित श्रोत्यांकडे अंगुलीनिर्देश केला. विहिरी, जलाशये कोरडे आहेत. त्यामध्ये पाणी नाही, परंतु शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आहे. दुष्काळ सदृष्य म्हणत खेळ चालवलाय, केंद्रीय पथक आले, मिळाले काय? हे पथक लेझीम पथक होते का? गाजर दाखवता पण गाजरही देत नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला.यावेळी उज्वला योजनेचे कनेक्शन किती जणांना मिळाले? पीक विम्याचे पैसे किती जणांना मिळाले? कर्जमाफी किती जणांना झाली? असे प्रश्न विचारत ठाकरे म्हणाले, कर्जमाफी नव्हे शिवसेनेला कर्जमुक्ती पाहिजे. अन्नदात्याला खोटं बोलून फसवतात? कर्जमाफी का झाली नाही? पात्र ठरुनही कर्जमाफी मिळत नाही. घोषणांचे सोंग आणि ढोंग करु नका अशी टीका करताना मी ‘मन’ की नव्हे ‘जन की बात’ करतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.राम मंदिराबाबत सरकारच्या भूमिकेवर बोलताना ठाकरे म्हणाले, हा विषय घटनापीठाकडे टोलविला. मग निवडणूक जाहीरनाम्यात का उल्लेख केला ? मंदिर वहीं बनायेंगे, तारिख नहीं बतायेंगे असेच चालले आहे. शिवसेना मात्र पहले मंदिर फिर सरकार यावर ठाम असल्याचे ते म्हणाले.जुमल्यावर जुमले, घोषणांचे जुमले सुरु आहेत. रामाचासुद्धा जुमला करत आहेत. घोषणांचा पाऊस करुन दुष्काळग्रस्त जनतेचे हंडे भरणार नाहीत, केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा, तुमचे दिवसच किती उरले? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.केवळ जनतेसाठी दुष्काळ नसून बीड जिल्ह्यात राजकारणासाठी शिवसेनेचा दुष्काळ आहे. शिवसेनेचा राजकीय दुष्काळ हटविण्याचे आवाहन करताना ‘दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर’ असल्याचे ठाकरे म्हणाले.‘लोकमत’ लोकांचे मतसरकारच्या घोषणा कशा फसव्या आहेत, हे सांगताना त्यांनी ९ जानेवारी रोजीच्या ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीचा वारंवार उल्लेख करून अंक दाखविला.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय करण्यासाठी राज्यात कर्ज मागणा-यांची संख्या ३० हजारांवर आहे आणि प्रत्यक्षात मात्र ६ हजार लोकांनाच कर्ज मिळणार, अशी बातमी ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीने छापली होती.याचा उल्लेख करून ते म्हणाले की, ‘लोकमत’ने छापले आहे. लोकांचे मत आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात ‘लोकमत’चा अंक दाखवून केला.

टॅग्स :BeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा